शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला नेत्यांच्या स्मारकांपेक्षा शाळा, महाविद्यालये हवी आहेत: इम्तियाज जलिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:19 IST

‘मै मनकी नही, दिलकी बात करना चाहता हूं ’:

औरंगाबाद : ‘मै मन की नही, दिल की बात करता हूं’, असं म्हणत व त्या अनुषंगाने अनेक उदाहरणे देत शुक्रवारी खासदार इम्तियाज जलिल यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मने जिंकली.

वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित अभिवादन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड होते, तर डॉ. गफ्फार कादरी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

खा. जलिल म्हणाले, मी तर विरोधी पक्षाचा खासदार आहे. पण, तुमच्यासारखी जनता हीच माझी ताकद आहे. त्या ताकदीच्या भरवशावर मी प्रयत्नांची शिकस्त करीत असतो. २०१४ मध्ये जोखीम घेऊन विधानसभा लढली. जिंकलो. २०१९ मध्ये जोखीम पत्करूनच लोकसभा लढली. प्रयत्न केला तर यश पदरी पडतेच. आज समाजाला शाळा, महाविद्यालये हवी आहेत. नेत्यांच्या स्मारकांपेक्षा समाजोपयोगी गोष्टी घडल्या पाहिजे यावर भर दिला व आज शहराला आठ- आठ दिवस पाणी येत नाही, याला आपणही जबाबदार आहोत, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात राजाराम राठोड म्हणाले, जाती धर्माने देश मोठा होणार नाही. खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य आले पाहिजे. धर्मनिरपेक्षता महत्त्वाची आहे. आज तीच नाहीशी होत आहे. वसंतराव नाईक हे पाच वेळा त्या काळात आमदार म्हणून निवडून आले. मागासवर्गीयांना शिक्षण मिळावं, ही त्यांची प्रारंभापासूनची भूमिका होती. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ताकद त्यांच्यात होती, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्राचार्य जगदीश भराड यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अभय राठोड यांचेही यावेळी भाषण झाले. मंचावर संस्थेचे सचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष डॉ. बिपीन राठोड यांची, तसेच प्रा. अजित दळवी, प्रा. अनुया दळवी, प्राचार्य मदनसिंग राठोड, प्रा. फुलसिंग जाधव, आदींची विशेष उपस्थिती होती. प्रा. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण बोबडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद