शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

छत्रपती संभाजीनगरची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याचे जायकवाडीत रोज बाष्पीभवन

By बापू सोळुंके | Updated: May 2, 2024 19:31 IST

तापमान वाढल्याचा फटका : जायकवाडी प्रकल्पाच्या ३५ हजार हेक्टरवर पाण्याची वाफ

छत्रपती संभाजीनगर : १८ लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज जायकवाडी प्रकल्पात वाफ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने बाष्पीभवन वाढल्याची माहिती लाभक्षेत्र कडा विकास प्राधिकरणाने (कडा) दिली.

मराठवाड्याची राजधानीचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण शहर आणि एमआयडीसीला जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यासोबत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलितखाली येते. यामुळेच जायकवाडी प्रकल्पाला मराठवाड्याचा भाग्यविधाता म्हणून ओळखल्या जाते. महिनाभरापासून मराठवाड्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.

छत्रपती संभाजीनगरचे तापमानाने ४२अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यावर होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यातील रोज सुमारे ५२० एमएलडी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. हे पाणी छत्रपती संभाजीनगर शहराला सलग चार दिवस पुरेल एवढे असल्याचे कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ३५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पापैकी आज केवळ २० हजार हेक्टरवर पाणीसाठा पसरलेला आहे. प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उरला आहे. यातच वाढत्या तापमानामुळे रोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन हाेत आहे. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना करणेही खर्चिक असल्याने त्याचा वापर केला जात नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाJayakwadi Damजायकवाडी धरण