शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याचे जायकवाडीत रोज बाष्पीभवन

By बापू सोळुंके | Updated: May 2, 2024 19:31 IST

तापमान वाढल्याचा फटका : जायकवाडी प्रकल्पाच्या ३५ हजार हेक्टरवर पाण्याची वाफ

छत्रपती संभाजीनगर : १८ लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज जायकवाडी प्रकल्पात वाफ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने बाष्पीभवन वाढल्याची माहिती लाभक्षेत्र कडा विकास प्राधिकरणाने (कडा) दिली.

मराठवाड्याची राजधानीचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण शहर आणि एमआयडीसीला जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यासोबत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलितखाली येते. यामुळेच जायकवाडी प्रकल्पाला मराठवाड्याचा भाग्यविधाता म्हणून ओळखल्या जाते. महिनाभरापासून मराठवाड्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.

छत्रपती संभाजीनगरचे तापमानाने ४२अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यावर होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यातील रोज सुमारे ५२० एमएलडी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. हे पाणी छत्रपती संभाजीनगर शहराला सलग चार दिवस पुरेल एवढे असल्याचे कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ३५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पापैकी आज केवळ २० हजार हेक्टरवर पाणीसाठा पसरलेला आहे. प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उरला आहे. यातच वाढत्या तापमानामुळे रोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन हाेत आहे. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना करणेही खर्चिक असल्याने त्याचा वापर केला जात नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाJayakwadi Damजायकवाडी धरण