शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मोफत उपचारासाठी आवश्यक, आतापर्यंत १४ पैकी ८ लाख नागरिकांना गोल्डन कार्ड

By विजय सरवदे | Updated: March 12, 2024 12:52 IST

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो

छत्रपती संभाजीनगर : आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड अनिवार्य असून, हे कार्ड काढण्यासाठी कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड आवश्यक आहे. वरच्या उत्पन्न गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड काढून ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक करावे लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु ज्यांचे रेशन कार्ड हे आधार कार्ड व मोबाइलसोबत लिंक नाही, त्यांचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वस्त धान्य दुकानदार, तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना दिल्या आहेत. शासनाने पूर्वी जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार कार्डधारकांचे या कार्डाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर १० लाखांचे उद्दिष्ट झाले. आता नगरपालिका, महापालिका कार्यक्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील १४ लाख ४९ हजार ६६८ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ३९१ नागरिकांपैकी काही जण मयत आहेत, तर बहुतेक जण स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे सध्या १२ लाख ८५ हजार ५०९ नागरिकांपैकी ८ लाख ६० हजार ७१७ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले आहे. ही मोहीम निरंतरपणे चालूच राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचारज्या कुटुंबाकडे पिवळे, केशरी किंवा पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड आहे व ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक असेल, तर त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड मिळू शकते. अशा कार्डधारकाने पहिल्यांदा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचा रुग्णालयात मोफत उपचार घेता येईल. त्यानंतरही अधिक उपचाराची गरज असेल, तर त्यांना महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पुन्हा ५ लाखांपर्यंत असे एकूण १० लाखांचा मोफत उपचार घेता येतो.

कार्ड नसेल तर...जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे स्वत: ऑनलाइन अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून हे कार्ड काढता येते. मात्र, त्यांना केवळ महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य