शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मोफत उपचारासाठी आवश्यक, आतापर्यंत १४ पैकी ८ लाख नागरिकांना गोल्डन कार्ड

By विजय सरवदे | Updated: March 12, 2024 12:52 IST

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो

छत्रपती संभाजीनगर : आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड अनिवार्य असून, हे कार्ड काढण्यासाठी कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड आवश्यक आहे. वरच्या उत्पन्न गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड काढून ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक करावे लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु ज्यांचे रेशन कार्ड हे आधार कार्ड व मोबाइलसोबत लिंक नाही, त्यांचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वस्त धान्य दुकानदार, तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना दिल्या आहेत. शासनाने पूर्वी जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार कार्डधारकांचे या कार्डाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर १० लाखांचे उद्दिष्ट झाले. आता नगरपालिका, महापालिका कार्यक्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील १४ लाख ४९ हजार ६६८ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ३९१ नागरिकांपैकी काही जण मयत आहेत, तर बहुतेक जण स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे सध्या १२ लाख ८५ हजार ५०९ नागरिकांपैकी ८ लाख ६० हजार ७१७ नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले आहे. ही मोहीम निरंतरपणे चालूच राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचारज्या कुटुंबाकडे पिवळे, केशरी किंवा पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड आहे व ते आधार कार्ड आणि मोबाइलसोबत लिंक असेल, तर त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड मिळू शकते. अशा कार्डधारकाने पहिल्यांदा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचा रुग्णालयात मोफत उपचार घेता येईल. त्यानंतरही अधिक उपचाराची गरज असेल, तर त्यांना महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पुन्हा ५ लाखांपर्यंत असे एकूण १० लाखांचा मोफत उपचार घेता येतो.

कार्ड नसेल तर...जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे स्वत: ऑनलाइन अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून हे कार्ड काढता येते. मात्र, त्यांना केवळ महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य