शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आरोग्य यंत्रणेवरील ताण किंचित हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:05 AM

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून सुरू केलेल्या निर्बंधांमुळे शहरात दररोज सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू कमी ...

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून सुरू केलेल्या निर्बंधांमुळे शहरात दररोज सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रविवारी सायंकाळी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शहरात आता फक्त ७ हजार ८३९ सक्रिय रुग्ण आहेत. १५ दिवसांपूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १२ हजारांपर्यंत होती.

संचारबंदीतही अनेक नागरिक शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अत्यावश्यक सेवेला वेळेची मर्यादा घालून देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच आवश्यक साहित्य खरेदी करण्याची मुभा दिली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. रविवारी दुपारी १ वाजेनंतर शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते. संचारबंदीत बाहेर पडणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या निर्णयाचा परिणाम भटकंती करणाऱ्या तरुणांवर चांगला झाला आहे. पोलीस दिवसभर प्रमुख रस्त्यांवर गस्त घालून नागरिकांना घरी बसण्याची विनंती करीत आहेत. मागील वर्षी ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात आला होता, तेत दृश्य रविवारी औरंगाबादकरांना पाहायला मिळाले. औरंगाबादकरांच्या संयमाचा परिणाम आता दिसू लागला आहे. रविवारी शहरात फक्त ६५६ बाधित रुग्ण आढळले.

शहरात आरोग्य यंत्रणेवरील ताणही किंचित हलका झाला आहे. घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या साडेपाचशेपेक्षा खाली येत नव्हती. रविवारी घाटीत ४९० रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८५, शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये २ हजार ८२२, मेल्ट्रॉन हॉस्पिटल ३४९, कोविड केअर सेंटर १६४५, होम आयसोलेशनमध्ये २ हजार ३४८ रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या जवळपास ५ हजारांपर्यंत गेली होती.