शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद महापालिकेवर सहा महिने प्रशासक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:56 IST

सहा महिने शासन प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांना ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

ठळक मुद्दे निवडणूक प्रक्रियेला होतोय बिलंबनिवडणूक पुढे ढकलण्याची चर्चा

औैरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कालावधी २० एप्रिल रोजी संपणार आहे. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून वॉर्ड आरक्षणासंदर्भात सोडतही घेण्यात येते. यंदा जानेवारी महिना संपत आला तरी आयोगाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक सहा महिन्यांसाठी लांबणार असल्याची चर्चा सुरू आहे. सहा महिने शासन प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांना ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

१९८८ पासून आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती होते. त्यानंतर सत्तेमधील महत्त्वाची पदे आपसात वाटून घेण्यात येतात. आता युती तुटल्याने शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागेल. यंदाच्या मनपा निवडणुकीतही कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. ५६ या जादुई आकड्यापर्यंत जाण्यासाठी सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावीच लागणार आहे. अगोदर महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचे निश्चित झाले होते. राज्यातील महाआघाडी सरकारने प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करून वॉर्ड पद्धतीनेच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेलाही आयोगाकडून प्रचंड विलंब होत आहे. यापूर्वी मनपाच्या निवडणुकांमध्ये आयोगाकडून डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वॉर्ड आरक्षणाची सोडत घेण्यात आली. यंदा वॉर्ड रचनेचा आराखडा सादर करून तीन आठवडे उलटले तरी आयोगाकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जानेवारी महिना संपत आला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबादेत आले असताना त्यांनी काही विश्वासातील स्थानिक मान्यवरांसोबत चर्चा केल्याचे कळते. मनपा निवडणुकीसंदर्भात बराच वेळ त्यांनी चर्चा केली, मनपावर सहा महिने प्रशासक ठेवून विकास कामे करूनच मतदारांसमोर जावे अशी चर्चा यावेळी झाल्याचीही चर्चा  आहे.

महापालिका बरखास्त करणार?महापालिकेतील राजकीय मंडळींची विविध विकास कामांत होणारी लुडबूड लक्षात घेऊन शासन एप्रिल २०२० नंतर लगेच महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमणार आहे. विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनाच प्रशासक म्हणून ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

ही तर निव्वळ चर्चामागील काही दिवसांपासून शहरात अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे अशा पद्धतीने कोणीच दुजोरा दिलेला नाही. महापालिकेचा कार्यकाल संपताच प्रशासक नेमण्यात येणार असल्याचेही कानावर येत आहे.    - नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा