शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

साहेब, पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:02 AM

औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणते कारण सांगेल याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या ...

औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणते कारण सांगेल याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या एकाने चक्क पकडलेले उंदीर सोडण्यासाठी घराबाहेर पडल्याचे अजब कारण क्रांती चौक पोलिसांना सांगितले. त्याचे हे कारण पोलिसांना न पटल्याने त्याला ५०० रुपये दंड करण्यात आला.

क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गायकवाड, हवालदार योगेश नाईक आणि कर्मचारी औरंगपुऱ्यात तैनात होते. यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडवले. संचारबंदीचे नियम मोडून कुठे फिरत आहात, असे पोलिसांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे अजब कारण पोलिसांना सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून पोलीस अचंबित झाले. घरात खूप उंदीर झाल्यामुळे उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. यात दोन उंदीर अडकले होते. हे उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे तो म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.

वाढत्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण राज्यात काल रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत फिरणारे बहुतेक नागरिक दवाखान्यात जात आहे, किराणा सामान आणण्यासाठी निघालो, तर काही जण गळ्यात ओळखपत्र अडकून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याची बतावणी पोलिसांना करताना दिसले. संचारबंदीचा आज पहिला दिवस. संचारबंदी मोडून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले. यामुळे सकाळपासून पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त आणि सर्व ठाणेदार फौजफाट्यासह विविध रस्त्यांवर उतरले होते. आकाशवाणी चौकात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रखरखत्या उन्हात नागरिकांवर कारवाई केली.

उपायुक्त खाटमोडे, एसीपी वानखेडे कारवाईत सहभागी

दिवसभरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे क्रांती चौकात होते. हर्सूल टी पॉइंट येथे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी कारवाई केली.

चौकट

पिळदार मिशांमुळे मास्क नाही

आजच्या कारवाईदरम्यान एक जण त्याच्या पिळदार मिशा इतरांना दिसाव्यात म्हणून तो विनामास्क दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवून दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दम्याचा त्रास आहे. श्वास गुदमरत असल्याने मास्क काढल्याचे दुचाकीस्वाराचे म्हणणे होते.

कोट...

दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक; रिक्षाचालकांवर कारवाई

दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास रिक्षाचालकांना मनाई आहे. या नियमाला पायदळी तुडवत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर यावेळी पोलिसांनी कारवाई केली.