शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष...

By admin | Updated: July 23, 2016 01:10 IST

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजले असून, रोपांच्या कमतरतेमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे उघडकीस आले

औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबादमध्ये १ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजले असून, रोपांच्या कमतरतेमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. ‘एकच लक्ष्य; दोन कोटी वृक्ष’ ही घोषणा ‘एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष’अशी झाली आहे. देवळाई, सातारा टेकड्यांवरील हजारो खड्डे पावसाने पूर्णत: बुजले असून, हर्सूल तलावाच्या सीमेवर २ हजार जांभळांची झाडे लावण्याची संकल्पनादेखील हवेत विरली आहे. तलावालगत जांभळांची झाडेही नाहीत आणि खड्डेदेखील नाहीत. अशा परिस्थिती असताना जिल्ह्यात १ जुलै रोजी झालेल्या वृक्षारोपण लक्ष्यपूर्तीचा दावा किती खरा किती खोटा याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे. मराठवाडा विभागात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४.६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. त्यात वाढीसाठी १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम राबविली तरी रोपं नसल्यामुळे ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे दिसते. या वृक्षारोपण मोहिमेत महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, नगरविकास, सहकार व पणन, सांस्कृतिक कार्य व पर्यटन, उच्च व तंत्रशिक्षण, गृह, परिवहन, ऊर्जा, विधि व न्याय, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रीडा, आदिवासी विकास, जलसंपदा, सामाजिक न्याय आणि कृषी, असे राज्य शासनाचे २० विभाग सहभागी झाले होते. या सर्व विभागांनी कुठे वृक्षारोपण केले, याचे परीक्षण कोण करणार, असा प्रश्न आहे. वृक्षारोपणासाठी विभागातील सामाजिक वनीकरण विभागाच्या ३४, वन विभागाच्या ८७ व इतर शासकीय विभागांच्या ७ तसेच २९ खाजगी रोपवाटिकांमधून रोपे उपलब्ध करून देण्यात आली; परंतु रोपांची संख्या कमी पडल्याने खोदलेले खड्डे बुजले आहेत. रोपं नसल्यामुळे खड्डे बुजले...वृक्षारोपण मोहिमेसाठी खड्डे केले; परंतु रोपं नसल्यामुळे खड्डे बुजले. रोपं मिळाली नाहीत. कुठेही रोपे शिल्लक नव्हती म्हणून काही ठिकाणी खड्डे तसेच राहिले असतील. या मोहिमेत सहभाग घेणाऱ्या संस्था शासनाच्या होत्या. प्रत्येक संस्थेकडे वृक्षारोपणाची नोंद असेलच. ती नोंद संकलित करावी लागणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा मूल्यांकन विभाग आहे. तो या मोहिमेतील जगलेल्या वृक्षांची नोंद घेईल, असे उपवरसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे यांनी सांगितले. १ जुलैची उद्दिष्टपूर्ती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तो कागदावरच असल्याची परिस्थिती सातारा, देवळाई, हर्सूल परिसरातील बुजलेले खड्डे पाहिल्यानंतर निर्माण होत आहे. यावर गिऱ्हेपुजे म्हणाले, ज्या संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाचे आॅडिट करण्याच्या सूचना अजून वरिष्ठ पातळीकडून आलेल्या नाहीत. आॅडिट कोण करणार हे ठरलेले नाही. आॅडिट झाल्यावर सर्व काही समोर येईल. औरंगाबादमधील रोपांची स्थिती..औरंगाबाद जिल्ह्यात ७ लाख २० हजार वृक्ष लावण्याचे टार्गेट होते; परंतु ३ शासकीय आणि ८ खाजगी रोपवाटिकांमध्ये फक्त १ लाख ८५ हजार ३०० रोपे होती. अशा स्थितीत उर्वरित रोपे कुठून आणली. जुन्याचे नवीन करून लक्ष्यपूर्ती करण्यात आली काय, यासारखे काही प्रश्न पुढे येत आहेत. अशीच अवस्था मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत असू शकते. जालना जिल्ह्यात ३ लाख ३० हजार, बीड ८ लाख २० हजार, परभणी ३ लाख १० हजार, लातूर ९ लाख १० हजार, उस्मानाबाद ५ लाख ५० हजार, नांदेड ६ लाख ४० हजार, हिंगोली ५ लाख ३० हजार वृक्ष लावण्याचे टार्गेट होते. जांभूळ, वड, पिंपळ या झाडांच्या रोपांची संख्या कमी होती. या मोहिमेसाठी झालेल्या खर्चाबाबत गिऱ्हेपुजे यांनी सांगितले, प्रत्येक विभागाने आपापल्या पातळीवर खर्च केला असेल. रोपे तर वन विभागाने मोफत उपलब्ध करून दिली होती. कुठे कमी पडली असतील तर त्यासाठी थोडाफार खर्च झाला असेल. हे प्रत्येक विभागाने केलेल्या वृक्षारोपणाच्या आॅडिटनंतरच कळू शकेल. खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे काय, यावर ते म्हणाले, वृक्षारोपण मोहीम यापुढेही निरंतर चालूच राहणार आहे. हर्सूल तलाव सीमेलगत जांभूळवन निर्मितीची संकल्पना होती. त्यासाठी १ जुलै रोजी २ हजार जांभळांची झाडे तलावाच्या सीमेवर लावण्यात येणार होती. तलावाच्या सीमेवर कुठलेही वृक्षारोपण झाले नसल्याचे हे छायाचित्र.