शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ औरंगाबादचे शीख बांधव एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:30 IST

तीनही कृषी कायदे संसदेत चर्चा न करता संमत करण्यात आले आहेत, त्यामुळे ते असंवैधानिक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

औरंगाबाद: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज औरंगाबादेतील शीख बांधव एकवटले. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली उस्मानपुरा चौकात आंदोलकांनी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. तीनही कृषी कायदे संसदेत चर्चा न करता संमत करण्यात आले आहेत, त्यामुळे ते असंवैधानिक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू झाले.दोन तासानंतर दुपारी एक वाजता हे आंदोलन संपले. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख व आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदू घोडेले आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदेशपालसिंग छाबडा, सुरेंद्रसिंग साबरवाल, रणजितसिंह गुलाटी,नवीनसिंग ओबेरॉय, राजेंद्रसिंग जबिंदा, हरीसिंग काचवाला,राजेंद्रसिंग चंढोक आदींनी यावेळी मते मांडली. सरकार अन्नदात्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली.

शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे..भारतमाता की जय, वंदे मातरम्, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा आंदोलक देत होते. आदेशपालसिंग छाबडा म्हणाले, शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याची हेळसांड या देशात होत आहे. लाखो शेतकरी थंडीत कुडकुडत दिल्लीत आंदोलन करीत आहेत.अनेक शेतकरी प्राणास मुकले तरी केंद्र सरकारला जाग येईना, ही मोठी दु:खाची बाब होय. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन