शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

शेतीला औषधी वनस्पतीची जोड दिल्यास उत्पन्नात हमखास वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 12:34 IST

‘कृषीदूत’चे राकेश कुमार चौधरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

औरंगाबाद : शेती क्षेत्राला आलेली मरगळ दूर करण्यासाठी औषधी वनस्पतीची जोड दिल्यास विक्री व्यवस्थेचे शिवधनुष्य पेलण्याचे काम ‘कृषीदूत’च्या माध्यमातून आम्ही करू, असा विश्वास राकेश चौधरी यांनी व्यक्त केला.

कृषीदूत विश्व विकास फाऊंडेशनची पहिली राज्यस्तरीय परिचय बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात शुक्रवारी झाली. या बैठकीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे व्यापारी गब्बर होत असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यासाठी शेतात औषधी वनस्पतीची लागवड केली, तर तिला हमीभाव देण्याची जबाबदारी ‘कृषीदूत’ घेईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन अडीच ते तीन पटीने वाढेेल. शेतीत राबणाऱ्या लोकांची रुची वाढेल, असा विचार आपल्या शेतात औषधी वनस्पती सफलतापूर्वक उगविणाऱ्या राकेश भुते (ब्रह्मी), संतोष दरेकर, डॉ. धनंजय नेवाडकर, चंद्रकांत सावरा आदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘कृषीदूत’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कोंडिराम धुमाळ, विनायक हर्बलचे राकेश चौधरी, प्रवक्ते पुष्कराज सिंह, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरविंद धाबे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या राज्यस्तरीय बैठकीला राजस्थानसह भंडारा, नागपूर, पालघर, पुणे तसेच मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतील वनस्पती शेतीचे जाणकार उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग नायक, सूरज वैद्य, उमाशंकर, अभिलाख सिंह, भूषण सिरसाठ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घोडे यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी