शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ भरण्यास लागायचा वेळ, तपासणीत मुख्य जलवाहिनीवर सापडल्या ५०० अवैध नळ जोडण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:07 IST

अवैध रित्या नळ कनेक्शन घेतल्याने पैठण शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. 

पैठण (औरंगाबाद ) : पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य भरणा लाईनमधून अनधिकृतपणे घेतलेले दहा वीस तीस नव्हे तर तब्बल ५०० नळ कनेक्शन मंगळवारी नगर परिषद प्रशासनाने तोडले. भरणालाईनवर अवैध नळ कनेक्शनची संख्या वाढल्याने पैठण शहरातील जलकुंभ भरण्यास अतिरिक्त वेळ लागत होता. यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब सुरू होती.

जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनी द्वारे पैठण शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो.  नँशनल हायवे ७५२  पैठण औरंगाबाद या रस्त्यावर समांतर अशी १२.५ किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या दरम्यान अनेक व्यावसायिकांनी रोडवर विविध उद्योग थाटले आहेत. शिवाय निवासी घरे,  छोटेमोठे उद्योग, मंगल कार्यालये उभारण्यात आली आहे. यातील बहुतेकांनी नगर परिषदेच्या मुख्य भरणा लाईन वरून अवैध रित्या नळ कनेक्शन घेतल्याने पैठण शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. 

वेळेत शहरातील जलकुंभ भरत नसल्याने काही भागात अनियमित, कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. यामुळे शहरभर नगर परिषदेच्या नावाने बोंबाबोंब सुरू होती. पाणीपुरवठा निरीक्षक संकटी पापुलवार यांनी पथकासह दोन दिवस मुख्य जलवाहिनीची पाहणी केल्यानंतर अनधिकृत नळ कनेक्शनचे गौडबंगाल समोर आले.मंगळवारी पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार यांनी विशेष पथकासह डावा कालवा ते पाचोड फाटा या दरम्यान असलेले सर्व अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. संबंधितांनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतल्याचा अहवाल प्रशासकांना सादर करून यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पापुलवार यांनी सांगितले. अनधिकृत नळ घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण