शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:11 IST

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या शटडाऊनसोबतच महापालिकाही जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १४०० आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणार आहे. दिवाळीपूर्वी एकदा शटडाऊन घेण्याचा मनोदय मनपाने व्यक्त केला होता. शुक्रवारी आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा आॅक्सिजनवर आली आहे. विजेच्या अंतर्गत केबल, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाही खराब झाली आहे. आहे त्या परिस्थितीत महापालिका पाणीपुरवठा करीत आहे. अलीकडेच जलतज्ज्ञांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्याचा अभ्यास केला. यामध्ये प्रचंड त्रुटी आढळून आल्या आहेत. मुख्य जलवाहिन्यांवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याचा अहवालही आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पाण्याची गळती अवघ्या २ टक्क्यांवर आणल्यास शहरातील लाखो नागरिकांना फायदा होईल, असेही मनपा आयुक्तांनी नमूद केले होते.

जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठ्याची यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी वीज कंपनी दुरुस्तीसाठी ७ तास वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. या बंद काळात जायकवाडी येथील वीज कंपनीची यंत्रणा दुरुस्त करण्यात येईल. या कामासोबतच महापालिकाही जलवाहिन्यांची दुरुस्ती, केबल बदलणे आदी छोटी-छोटी कामे हाती घेणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. अधिकृतरीत्या ७ तासांचा खंडण काळ असला तरी तो किमान ९ तास चालण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणारशुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांमध्ये जेवढे पाणी असेल तेवढे नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रात्री ७ वाजता जायकवाडी येथील काम संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू होईल. रात्री १२ नंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत वेळ लागणार आहे. ज्या वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता त्यांना थेट रविवारीच पाणी मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी ज्यांना पाणी देण्यात येणार होते त्यांना सोमवारची वाट पाहावी लागेल.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद