शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:11 IST

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या शटडाऊनसोबतच महापालिकाही जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १४०० आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणार आहे. दिवाळीपूर्वी एकदा शटडाऊन घेण्याचा मनोदय मनपाने व्यक्त केला होता. शुक्रवारी आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा आॅक्सिजनवर आली आहे. विजेच्या अंतर्गत केबल, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाही खराब झाली आहे. आहे त्या परिस्थितीत महापालिका पाणीपुरवठा करीत आहे. अलीकडेच जलतज्ज्ञांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्याचा अभ्यास केला. यामध्ये प्रचंड त्रुटी आढळून आल्या आहेत. मुख्य जलवाहिन्यांवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याचा अहवालही आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पाण्याची गळती अवघ्या २ टक्क्यांवर आणल्यास शहरातील लाखो नागरिकांना फायदा होईल, असेही मनपा आयुक्तांनी नमूद केले होते.

जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठ्याची यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी वीज कंपनी दुरुस्तीसाठी ७ तास वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. या बंद काळात जायकवाडी येथील वीज कंपनीची यंत्रणा दुरुस्त करण्यात येईल. या कामासोबतच महापालिकाही जलवाहिन्यांची दुरुस्ती, केबल बदलणे आदी छोटी-छोटी कामे हाती घेणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. अधिकृतरीत्या ७ तासांचा खंडण काळ असला तरी तो किमान ९ तास चालण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणारशुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांमध्ये जेवढे पाणी असेल तेवढे नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रात्री ७ वाजता जायकवाडी येथील काम संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू होईल. रात्री १२ नंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत वेळ लागणार आहे. ज्या वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता त्यांना थेट रविवारीच पाणी मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी ज्यांना पाणी देण्यात येणार होते त्यांना सोमवारची वाट पाहावी लागेल.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद