शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:11 IST

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या शटडाऊनसोबतच महापालिकाही जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १४०० आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणार आहे. दिवाळीपूर्वी एकदा शटडाऊन घेण्याचा मनोदय मनपाने व्यक्त केला होता. शुक्रवारी आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा आॅक्सिजनवर आली आहे. विजेच्या अंतर्गत केबल, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाही खराब झाली आहे. आहे त्या परिस्थितीत महापालिका पाणीपुरवठा करीत आहे. अलीकडेच जलतज्ज्ञांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्याचा अभ्यास केला. यामध्ये प्रचंड त्रुटी आढळून आल्या आहेत. मुख्य जलवाहिन्यांवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याचा अहवालही आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पाण्याची गळती अवघ्या २ टक्क्यांवर आणल्यास शहरातील लाखो नागरिकांना फायदा होईल, असेही मनपा आयुक्तांनी नमूद केले होते.

जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठ्याची यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी वीज कंपनी दुरुस्तीसाठी ७ तास वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. या बंद काळात जायकवाडी येथील वीज कंपनीची यंत्रणा दुरुस्त करण्यात येईल. या कामासोबतच महापालिकाही जलवाहिन्यांची दुरुस्ती, केबल बदलणे आदी छोटी-छोटी कामे हाती घेणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. अधिकृतरीत्या ७ तासांचा खंडण काळ असला तरी तो किमान ९ तास चालण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणारशुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांमध्ये जेवढे पाणी असेल तेवढे नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रात्री ७ वाजता जायकवाडी येथील काम संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू होईल. रात्री १२ नंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत वेळ लागणार आहे. ज्या वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता त्यांना थेट रविवारीच पाणी मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी ज्यांना पाणी देण्यात येणार होते त्यांना सोमवारची वाट पाहावी लागेल.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद