शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

राज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:58 IST

राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची याचिकाकर्त्याची मुख्य विनंती

ठळक मुद्देपुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर 

औरंगाबाद : हमी भाव, अनुदान, कर्जमाफी आदींसाठी आंदोलने करणाऱ्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांविरुद्धचे फौजदारी खटले शासन निर्णयानुसार मागे घेण्याची विनंती करणारी ‘जनहित’ याचिका शेतकरी युवा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित बबनराव काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

आंदोलनात जीवित हानी झाली नसलेल्या, तसेच सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची पाच लाखांपेक्षा कमी वित्तहानी झालेल्या घटनांमधील २०१४ पूर्वीचे फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ देत राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची याचिकाकर्त्याची मुख्य विनंती आहे. काळे यांनी याचिकेत नमूद केल्यानुसार मान्सूनचा लहरीपणा, वातावरणातील बदल आणि शेतीचे कमी उत्पादन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला (पिकांना) योग्य हमी भाव दिला नाही. परिणामी, शेतकरी अनुदानासाठी शासनावर अवलंबून आहेत. शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रस्त्यावर उतरावे लागते. परिणामी, मागील काही वर्षांत हमी भाव, अनुदान, कर्जमाफी आदींसाठी शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलने केली. परिणामी, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आणि काही घटनांमध्ये मालमत्तांचे नुकसान केल्याबद्दल शेतकऱ्यांविरुद्ध राज्यातील विविध न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, समाजात शांतता व सौहार्दता नांदावी यासाठी आंदोलनादरम्यान जीवित हानी झाली नसलेल्या, तसेच सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची पाच लाखांपेक्षा कमी वित्तहानी झालेल्या घटनांमधील सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्धचे फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ७ जुलै २०१० रोजी घेतला होता. त्यानंतर शासनाने १३ जानेवारी २०१५ रोजी वरील शासन निर्णयात ‘२०१४ पूर्वीचे’ वरील प्रकारात मोडणारे फौजदारी खटले मागे घेण्याची दुरुस्ती केली. त्यानंतर ज्या घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी झाली नाही, असे खटले त्वरित मागे घेण्याची शिफारस यासाठी नेमलेल्या समितीने सरकारी वकिलांना करावी, तसेच सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे पाच लाखांपर्यंत नुकसान झालेल्या घटनांमधील आरोपींच्या अर्जांची वाट न पाहता समितीने स्वत: खात्री करण्याचा निर्णय शासनाने १४ मार्च २०१६ रोजी घेतला होता. याचा लाभ देऊन शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ