शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का ? पोलीस भरतीला स्थगितीने संताप

By राम शिनगारे | Updated: November 3, 2022 11:58 IST

सतत लांबणाऱ्या भरतीविषयी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण

- राम शिनगारेऔरंगाबाद : मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरतीला मिळालेल्या स्थगितीमुळे संतापाचे वातावरण आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील किती जागा भरणार याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्तांनी पोलीस भरती करण्याविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेशही प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिले होते. या आदेशाला २४ तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस भरती पुढे ढकललीमागील काही वर्षांपासून सतत पोलीस भरती होणार असल्याची घोषणा राज्यकर्ते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लाटेनंतर २०२१ मध्ये रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भरती झालीच नाही. त्याच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय विद्यमान राज्य शासनाने घेतला. त्याची घोषणा झाल्यानंतर १२ तासांच्या आत तांत्रिक कारणास्तव भरती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात १९३ पदांसाठी होणार भरतीजाहीर केलेल्या जागांमध्ये शहर आयुक्तालयात एकही जागांची भरती दाखविण्यात आलेली नव्हती; तर ग्रामीण पोलीस विभागात ३९ आणि औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ अशा एकूण १९३ जागांसाठी भरती होणार आहे.

तरुणांच्या भावनांशी खेळपाच वर्षांपासून औरंगाबादेत भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.- नंदकिशोर सवडे, भरतीची तयारी करणारा तरुण

तयारीत डोक्यावरील केस गेलेगेल्या ४ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आई-वडील ऊसतोड करतात. आजपर्यंत शासनाने केवळ घोषणाच केल्या. भरती मात्र झालीच नाही. एवढ्या तयारीत डोक्याला केस राहिले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही जगणार तरी कसे?- कृष्णा जराड, भरतीची तयारी करणारा तरुण

वेळेवर भरती का होत नाहीमाझी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. मी ऊस तोडणी करून मुलीला शिकवते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शासन वेळेवर पोलीस भरती का घेत नाही. त्याचा मानसिक त्रास आम्हाला होतो.- ज्योती सिरसाट, पालक

मुलांना मोलमजुरी करून शिकवितोमाझा मुलगा, मुलगी मागील चार वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मुलांना मोलमजुरी करून शिकवितो. मुलंही दिवस-रात्र तयारी करीत आहेत, पण भरती वेळेवर होत नाही.- गणेश मुळे, पालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार