शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का ? पोलीस भरतीला स्थगितीने संताप

By राम शिनगारे | Updated: November 3, 2022 11:58 IST

सतत लांबणाऱ्या भरतीविषयी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण

- राम शिनगारेऔरंगाबाद : मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरतीला मिळालेल्या स्थगितीमुळे संतापाचे वातावरण आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील किती जागा भरणार याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्तांनी पोलीस भरती करण्याविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेशही प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिले होते. या आदेशाला २४ तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस भरती पुढे ढकललीमागील काही वर्षांपासून सतत पोलीस भरती होणार असल्याची घोषणा राज्यकर्ते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लाटेनंतर २०२१ मध्ये रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भरती झालीच नाही. त्याच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय विद्यमान राज्य शासनाने घेतला. त्याची घोषणा झाल्यानंतर १२ तासांच्या आत तांत्रिक कारणास्तव भरती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात १९३ पदांसाठी होणार भरतीजाहीर केलेल्या जागांमध्ये शहर आयुक्तालयात एकही जागांची भरती दाखविण्यात आलेली नव्हती; तर ग्रामीण पोलीस विभागात ३९ आणि औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ अशा एकूण १९३ जागांसाठी भरती होणार आहे.

तरुणांच्या भावनांशी खेळपाच वर्षांपासून औरंगाबादेत भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.- नंदकिशोर सवडे, भरतीची तयारी करणारा तरुण

तयारीत डोक्यावरील केस गेलेगेल्या ४ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आई-वडील ऊसतोड करतात. आजपर्यंत शासनाने केवळ घोषणाच केल्या. भरती मात्र झालीच नाही. एवढ्या तयारीत डोक्याला केस राहिले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही जगणार तरी कसे?- कृष्णा जराड, भरतीची तयारी करणारा तरुण

वेळेवर भरती का होत नाहीमाझी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. मी ऊस तोडणी करून मुलीला शिकवते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शासन वेळेवर पोलीस भरती का घेत नाही. त्याचा मानसिक त्रास आम्हाला होतो.- ज्योती सिरसाट, पालक

मुलांना मोलमजुरी करून शिकवितोमाझा मुलगा, मुलगी मागील चार वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मुलांना मोलमजुरी करून शिकवितो. मुलंही दिवस-रात्र तयारी करीत आहेत, पण भरती वेळेवर होत नाही.- गणेश मुळे, पालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार