शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का ? पोलीस भरतीला स्थगितीने संताप

By राम शिनगारे | Updated: November 3, 2022 11:58 IST

सतत लांबणाऱ्या भरतीविषयी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण

- राम शिनगारेऔरंगाबाद : मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरतीला मिळालेल्या स्थगितीमुळे संतापाचे वातावरण आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील किती जागा भरणार याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्तांनी पोलीस भरती करण्याविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेशही प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिले होते. या आदेशाला २४ तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस भरती पुढे ढकललीमागील काही वर्षांपासून सतत पोलीस भरती होणार असल्याची घोषणा राज्यकर्ते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लाटेनंतर २०२१ मध्ये रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भरती झालीच नाही. त्याच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय विद्यमान राज्य शासनाने घेतला. त्याची घोषणा झाल्यानंतर १२ तासांच्या आत तांत्रिक कारणास्तव भरती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात १९३ पदांसाठी होणार भरतीजाहीर केलेल्या जागांमध्ये शहर आयुक्तालयात एकही जागांची भरती दाखविण्यात आलेली नव्हती; तर ग्रामीण पोलीस विभागात ३९ आणि औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ अशा एकूण १९३ जागांसाठी भरती होणार आहे.

तरुणांच्या भावनांशी खेळपाच वर्षांपासून औरंगाबादेत भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.- नंदकिशोर सवडे, भरतीची तयारी करणारा तरुण

तयारीत डोक्यावरील केस गेलेगेल्या ४ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आई-वडील ऊसतोड करतात. आजपर्यंत शासनाने केवळ घोषणाच केल्या. भरती मात्र झालीच नाही. एवढ्या तयारीत डोक्याला केस राहिले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही जगणार तरी कसे?- कृष्णा जराड, भरतीची तयारी करणारा तरुण

वेळेवर भरती का होत नाहीमाझी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. मी ऊस तोडणी करून मुलीला शिकवते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शासन वेळेवर पोलीस भरती का घेत नाही. त्याचा मानसिक त्रास आम्हाला होतो.- ज्योती सिरसाट, पालक

मुलांना मोलमजुरी करून शिकवितोमाझा मुलगा, मुलगी मागील चार वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मुलांना मोलमजुरी करून शिकवितो. मुलंही दिवस-रात्र तयारी करीत आहेत, पण भरती वेळेवर होत नाही.- गणेश मुळे, पालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार