शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

उन्हाळ्यात जाणवणार दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 9:24 PM

औरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात ७ लाख जनावरे : पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकटऔरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात ६५ महसूल मंडळे असून, त्यापैकी २८ मंडळांत अपेक्षित सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. ५१ ते ७५ टक्क्यांमध्ये २९, तर ७६ ते १०० टक्क्यांमध्ये ८ महसूल मंडळांचा समावेश आहे. ऐन वेळेवर पाऊस न पडल्याने खरीप पिकांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कमी पाण्यामुळे रबी पेरणीचे धाडस करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे दिसत आहे. यामुळे दिवाळी आधीपर्यंत जिल्ह्यात अवघे ४ टक्के पेरणी झाली होती. जिथे माणसांनाच पिण्यासाठी कमी पाणी आहे तिथे जनावरांचे काय, त्यात कडबा कमी असल्याने उन्हाळ्यात जनावरांना कसे सांभाळायचे, असा यक्ष प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात लहान-मोठी ६७६१८० जनावरे आहेत. ही आकडेवारी २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार आहे. त्यांना दररोज ३५५३ मे.टन चारा लागतो, तर महिनाभरात १०६५६२ मे.टन चारा लागतो. यानुसार ३१ मे २०१९ पर्यंत ८१००८४ मे.टन चाºयाची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात ६६०६२५ मे.टन चारा उपलब्ध आहे. म्हणजे उन्हाळ्यात १ लाख ४९ हजार ४५९ मे.टन चाºयाची टंचाई जाणविणार आहे.

याशिवाय पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. अनेक गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पशुखाद्याचे भाव वाढू लागल्याने आता जनावरांना कसे सांभाळावे, असा प्रश्न पशुपालकांना पडू लागला आहे. परिणामी, अनेकांनी पशुधन विक्रीसाठी काढले आहे. मागील दुष्काळात चारा छावण्यांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. अनेक छावण्यांची चौकशी करण्यात आली. हा अनुभव लक्षात घेता यंदा चारा छावण्यांविषयी राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. नियमही आणखी कठोर करण्यात आले आहेत. यामुळे चारा छावण्या किती उघडतील व पशुधन वाचविण्यासाठी चारा कुठून उपलब्ध केला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कडबा महागलादुष्काळामुळे भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेता आता कडबा महाग होऊ लागला आहे. कडब्याच्या भावात २०० ते ३०० रुपयांनी भाववाढ होऊन ४००० ते ४५०० रुपये प्रति शेकडा विकत आहे, तर ऊसकुट्टीचे भाव १०० रुपयांनी वाढून २०० ते २५० रुपये प्रतिगोणी विकत आहे. सरकी ढेप १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे. मात्र, पुढील महिन्यात नवीन सरकी उपलब्ध झाल्यावर सरकी ढेपचे भाव थोडे कमी होतील. मात्र, कडबा व ऊसकुट्टीचे भाव वाढतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे म्हशी, गाय, बैल सांभाळणाºयांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद