शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:19 IST

नापिकीमुळे शेतीत काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे त्या चिंतेत होत्या.

ठळक मुद्दे मराठवाड्यात या वर्षातील ही अशी पहिलीच घटना दोन एकर शेतीसाठी महिला बचत गटाकडून सव्वालाखाचे कर्ज घेतले

कायगाव (जि. औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील एका शेतकरी महिलेने कर्जाला कंटाळून सोमवारी रात्री बारा वाजता आत्महत्या केली. संगीताबाई काशीनाथ पाठे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पुरुष शेतकरी आत्महत्यांची संख्या मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत असतानाच आता महिला शेतकरीही मृत्यूस कवटाळत आहेत.  मराठवाड्यात या वर्षातील ही अशी पहिलीच घटना असून यामुळे खळबळ उडाली आहे. 

या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. मंडळ अधिकारी सोनवणे यांनी पंचनामा केला. संगीताबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार गणेश काथार, सीमंत वाघमारे पुढील तपास करीत आहेत. 

याबाबत पखोरा गावचे माजी सरपंच भाऊसाहेब पदार म्हणाले की, संगीताबार्इंचे आपल्या कुटुंबियांवर मोठे प्रेम होते. शेतीकामासाठी घेतलेले कर्ज आपण फेडू, तुम्ही त्रास करून घेऊ नका, असे सांगून त्या नेहमी पतीला धीर देत. कर्ज फेडण्यासाठी वाटल्यास अर्धा एकर जमीन विकू, असेही त्या म्हणत. मात्र काही तरी मार्ग काढू, जमीन विकणे योग्य नाही, अशी पतीकडून समजूत काढली जायची. मयत संगीताबार्इंचा स्वभाव खूप चांगला होता. त्यांचा घरात आणि घराबाहेर कधीच कुणाबरोबर वाद नसायचा. पण कर्जफेड कशी करायची, यासाठी त्या नेहमी चिंतित असत. संपूर्ण गावाला त्यांच्या या समस्येची माहिती होती, अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पदार यांनी दिली.  

दोन एकर शेतीदोन एकर शेतीसाठी संगीताबार्इंनी चार वर्षांपूर्वी महिला बचत गटाकडून सव्वालाखाचे कर्ज घेतले होते. परंतु शेतात उत्पन्न न आल्याने त्या कर्जबाजारीपणाला कंटाळल्या होत्या. बचत गटाच्या महिला आणि ज्या वित्त संस्थेने बचत गटामार्फत कर्ज दिले होते, त्यांचे अधिकारी नेहमी कर्जाचे हप्ते भरावे, यासाठी घरी येऊन तगादा लावत होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, ही मोठी विवंचना होती. शेती कोरडवाहू असल्याने त्यात मागील पाच वर्षांत काहीच उत्पन्न आले नव्हते. त्यामुळे संगीताबार्इंनी हा मार्ग पत्करला. संगीताबार्इंच्या दोन मुलांपैकी एक सतरा वर्षीय मुलगा दहावीला आणि दुसरा सात वर्षांचा मुलगा इयत्ता दुसरीत शिकतो. 

महिला-पुरुष अशी वर्गवारी नाहीशेतकरी आत्महत्येची महिला-पुरूष अशी वर्गवारी केली जात नाही. कायगांव येथील प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. असे महसूल उपायुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी सांगितले. 

३१३ आत्महत्यामराठवाड्यात १ जानेवारी ते २८ मेपर्यंत ३१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २११ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. १ कोटी ४४ लाख रुपयांची शासकीय मदत करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये ३९, जालना ४५, परभणी २५, हिंगोली १८, नांदेड ३५, बीड ६९, लातूर ३३, उस्मानाबाद ४९ अशा ३१३ आत्महत्या झाल्या आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याdroughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद