शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धक्कादायक ! आरटीईतून मिळतोय श्रीमंतांना प्रवेश; दुर्बलांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:06 IST

Right To Education Aurangabad News शिक्षण संस्थाचालक, श्रीमंत व्यक्तींच्या पाल्यांची नावे या योजनेच्या लाभार्थींमध्ये दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देउत्पन्न जास्त सिद्ध कसे करणार तक्रार नसल्याने शिक्षण विभाग हतबल

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशात २५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, या योजनेतून श्रीमंतांनाही नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळत आहे. मात्र, पुराव्यांसह तक्रारी नसल्याने शिक्षण विभागही हतबल झाल्याने याला कसा चाप बसेल, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील ५८४ शाळांसाठी १६,५०० पेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यापैकी ५६७६ विद्यार्थ्यांची निवड झाली. तर १९१४ जणांची सोडतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या फेरीत ३ हजार १०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित १५३९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील प्रवेश ३ ऑक्टोबरपासून सुरू आहेत. यात एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. शिक्षण संस्थाचालक, श्रीमंत व्यक्तींच्या पाल्यांची नावे या योजनेच्या लाभार्थींमध्ये दिसू लागली आहेत.

शिक्षणाधिकारी म्हणतात...दरवर्षी सुमारे साठ हजारांवर अर्ज ऑनलाईन स्वरूपात येतात. ते थेट एनआयसीएण्डला जातात. तेथून छाननी होऊन या प्रवेशाच्या याद्या बनतात. कागदपत्रे ऑनलाईन दाखल करताना निकषात बसावे यासाठी अनेक जण शाळेजवळ राहतो, असे दाखवतात. तर अनेक व्यापारी, सधन व्यक्ती कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवतात. याआधारे ते योजनेच्या निकषात बसल्याने त्यांच्या पाल्यांना प्रवेश मिळतो. तर शहरातील अशाच प्रकरणात एका शाळेच्या प्रवेशाची आम्ही तपासणी, प्रत्यक्ष स्थळ पडताळणी केली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

उत्पन्न जास्त सिद्ध कसे करणारएका शिक्षण संस्थाचालकाच्या कुटुंबातील मुलीला प्रवेश मिळाल्याचे कळाले. त्याने ४५ हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र दाखवले आहे; पण त्यांचे उत्पन्न जास्त आहे, हे कसे सिद्ध करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असे प्रकरण असल्यास पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादSchoolशाळा