शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

धक्कादायक ! कारागृहात कैद्याला डॉक्टर ६ फुटांवरून तपासतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:54 IST

कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे.

ठळक मुद्दे जेल अधीक्षकांची तक्रार कैद्याला वेळेत घाटीत न पाठविल्याने मृत्यू 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात नियुक्त डॉक्टर ५ ते ६  फुटांवर कैदी रुग्णाला उभे करून त्यांची तपासणी करतात. कैद्यांना हात न लावता कर्मचाऱ्यामार्फत ईसीजी काढणे आणि अन्य औषधोपचार करतात. एवढेच नव्हे, तर एका कैदी रुग्णाने तक्रार करूनही त्याला वेळेत घाटीत न पाठविल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार कारागृह प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविल्याचे समोर आले. 

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात दीड हजाराहून अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे. डॉ. जहागीरदार आणि डॉ. कुंडलिकर तेथे तैनात आहेत. कारागृहातील कैदी आजारी पडल्यास सर्वप्रथम कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  बोलावण्यात येते.  त्यांच्यावर उपचार केले जातात. कैद्यांना विशेष उपचाराची गरज असेल तर त्यांना कारागृहामधून घाटी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी जहागीरदार हे रुग्ण कैद्यांना ५  ते ६ फूट अंतरावर उभे राहण्यास सांगतात. स्टेथोस्कोपने त्यांची तपासणी करीत नाहीत. कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे एका कैद्याला प्राणास मुकावे लागल्याची तक्रार प्रशासनाने आरोग्य विभाग आणि कारागृहाच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविली आहे.

या तक्रारीत म्हटले की, २४ मे रोजी रात्री  कैदी सचिन गायकवाड याची प्रकृती ठीक नसल्याची तक्रार केल्यामुळे त्याला डॉ. जहागीरदार यांना दाखविण्यात आले. त्यावेळी जहागीरदार यांनी त्यांना दूर उभे करून विचारपूस केली. यानंतर त्यास बराकीत पाठवले. दोन तासांनंतर कैद्याला त्रास होत असल्यामुळे पुन्हा डॉक्टरांना दाखविण्यात आले. त्यावेळी त्याला  घाटीत नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाला. डॉ. जहागीरदार यांनी कैद्याला वेळेत घाटीत पाठवले असते तर तो वाचला असता.

प्रशासन घेतेय काळजी तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाची साथ बळावली आहे. कोरोनाने कारागृहामध्ये शिरकाव केला. एकाच वेळी २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. १४ कारागृहरक्षक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कैद्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

डॉक्टरांनी केला आरोपाचा इन्कार; कारागृह अधीक्षकच करतात आमचा छळ आरोग्य विभागात २५ वर्षांपासून रुग्णसेवा करतो. कारागृह अधीक्षकांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत.  कैदी गायकवाडचा मृत्यू नैसर्गिक होता. आम्ही कैद्याच्या आरोग्याची मनापासून काळजी घेतो. कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव हे आम्हाला कैद्यासारखी वागणूक देतात. ते  आमचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत आहेत. याविषयी आरोग्य उपसंचालक आणि कारागृह उपमहानिरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसjailतुरुंग