शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अनाथ मुलीचे १६ व्या वर्षांत दोन लग्न; त्यानंतर झाली सामूहिक अत्याचाराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 13:16 IST

Rape on Minor Girl : घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले.

ठळक मुद्दे आभागी तरुणीवर अत्याचार करणारे कोण याचे कोडे उलगडले नाही.रेल्वे स्टेशन परिसरात झाला अत्याचार

औरंगाबाद : आई-वडिलाचे बालपणातच छत्र हरपल्याने दत्तक आई-वडिलांनी तिचे अवघ्या १६व्या वर्षी तिचे राजस्थानातील तरुणासोबत लग्न लावले. मात्र, तेथेही तिचा छळ सुरू झाल्यानंतर ती शेजारच्या तरुणाच्या भावाच्या घरी मदतीने खासगी ट्रॅव्हल बसने औरंगाबादेत पोहोचली. त्यांच्याशी झालेल्या कुरबुरीनंतर घराबाहेर पडलेल्या पीडितेवर औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात भेटलेल्या तरुणाने तिला स्वतःच्या घरी नेले आणि मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. मात्र तोही मारहाण करू लागल्यामुळे त्याचे घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले. या आभागी तरुणीवर अत्याचार करणारे कोण याचे कोडे पोलिसांना तीन दिवसांनंतरही उलगडता आले नाही.

वरिष्ठ सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रिमा (काल्पनिक नाव ) उत्तर प्रदेशातील रहिवासी. ८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे ती एकटीच बसलेली असल्याचे पाहून सतर्क नागरिकाने पोलिसांना आणि चाइल्डलाइनला फोन करून तिच्याविषयी कळविले. पोलीस आणि चाइल्डलाइनच्या महिला कार्यकर्त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या जबाब महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा थरकाप उडविणारा होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येथे ५ रोजी एकटी असताना पोलिसांनी तिला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे ती स्थानकातून बाहेर पडली आणि काही अंतरावर झाडाच्या आडोशाला जाऊन झोपली. रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ती लघुशंका करण्यासाठी तेथून काही अंतरावर गेली तेव्हा तीन नराधम तिच्यावर तुटून पडले. त्यांनी तिला तेथून उचलून अन्य ठिकाणी नेले आणि अत्याचार केल्याने ती बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावरील कपडे बाजूला पडलेले दिसले. तिने ते कपडे घातले. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांकडून संशयितांची चौकशीरेल्वेस्थानक परिसर सतत गुन्हेगार आणि नशेखोरांचा अड्डा बनलेला असतो. रात्रपाळीचे रिक्षाचालक नशेत प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. यामुळे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांची धरपकड आणि चौकशी सुरू केली. नराधमाची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ हे स्वतः या तपासांवर लक्ष ठेवून आहेत.