शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मागील ९ महिन्यांत १० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले; २ बनल्या कुमारी माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:03 IST

एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे.

ठळक मुद्दे६ जणींना स्वीकारण्यास घरच्यांचा विरोधआई- वडिलांचा मुलांशी कमी झाला संवाद

औरंगाबाद : अवघ्या १६ वर्षाची ती मुलगी. तिला वाटत होते की, आपल्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, तसाच आपल्यालाही असावा. राजकुमाराचे गुलाबी स्वप्न तिला पडू लागले. सोशल मीडियाद्वारे ती गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली. याची कुणकुण घरच्यांना लागली, अन अचानक ती मुलगी घरातून गायब झाली. ही काही एखाद्या चित्रपटातील किंवा टीव्ही सिरीयलमधील कथा नसून मागील ९ महिन्यात जिल्ह्यात अशा प्रकारे १० अल्पवयीन मुली आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या व त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांचे अज्ञान व प्रेमाचा गैरफायदा घेत २ मुलींच्या भाळी कुमारी मातेचा शिक्का बसला.  

समाजात घडणाऱ्या या वास्तवाची  दाहकता बाल कल्याण समितीकडे येणाऱ्या प्रकरणाच्या आकडेवारीवरून दिसते आहे. एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे. तर २ जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत  त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. या १२ मुली अवघ्या १५ ते १७ वयोगटातील आहेत. पळून गेलेल्यांमध्ये ९ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फूस लावून नेल्याची माहिती समोर आली आहे. बाल कल्याण समितीने या मुलींना बाल संरक्षण गृहात ठेवले आहे. त्यातील ६ मुलींना त्यांच्या पालकांनी घरी नेले पण बाकीच्या मुलींना घरी नेण्यास त्यांचे आई- वडील पुढे आले नाहीत, असे बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. मनोहर बनस्वाल यांनी सांगितले. 

मुलगी सुधारली, तर घरी नेतोआमची मुलगी सुधारली असेल तर आम्ही तिला घरी नेतो. मुलगी आमचे ऐकत नाही, आम्ही आमच्या जातीतील चांगल्या मुलासोबत तिचे लग्न लावून देऊ, तिला अनेक चांगले स्थळ येत होते, पण मुलगी त्या टुकार पोरासोबत घरातून पळून गेली. आम्ही कमावलेली इज्जत मातीत मिळविली, असे त्या मुलींच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. 

आई- वडिलांचा मुलांशी कमी झाला संवादज्या घरात आई- वडिलांचा आपल्या मुलांशी किंवा मुलीशी संवाद तुटतो. पालक आपल्या पाल्याला वेळ देऊ शकत नाही. तेथे या अल्पवयीन मुली आपणास कोणी तरी प्रेमाने बोलावे यासाठी बॉयफ्रेंडचा शोध घेतात. यात काही मुली फसविल्या जातात. असे प्रकार घडू नयेत म्हणून आईने आपल्या मुलीशी मैत्रिणीसारखे वागावे. त्यांना वेळ द्यावा. तसेच  आता मुलांना व मुलींना शाळेतच समुपदेशन करण्याची वेळ आली आहे. - ॲड. ज्योती पत्की, अध्यक्ष, बाल कल्याण समिती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद