शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ३० वर्षांत चार हजार मातृभाषा संपुष्टात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:27 IST

सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे

ठळक मुद्देजनगणना यंत्रणेमुळे भाषांचा लोपभाषा टिकवून ठेवण्यापेक्षा मारून टाकायला लोक आतुर झालेले आहेत.

औरंगाबाद : ‘जगात सुमारे सहा हजार मातृभाषा आहेत. त्यापैकी येत्या ३० वर्षांत चार हजार भाषा मरतील, संपुष्टात येतील. उरलेल्या दोन हजारपैकी सतराशे भाषा हात-पाय तोडलेल्या अवस्थेत राहतील व जेमतेम तीनशे भाषा शिल्लक राहण्याची शक्यता आहे’ असा धोका आज येथे विवेकानंद व्याख्यानमालेत प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. 

विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते विवेकानंद व कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मंचावर विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कोषाध्यक्ष तुषार शिसोदे व सहसचिव डॉ.यशोद पाटील यांची उपस्थिती होती. प्राचार्य श्याम शिरसाट यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा देवी, संदेश भंडारे, न्या. नरेंद्र चपळगावकर व प्राचार्य प्रताप बोराडे यांचे यावेळी दादाराव शेंगुळे, डॉ. अशोक गायकवाड, प्रभाकर मोरे, शुभांगी गोडबोले यांनी स्वागत केले. प्रा. मेघा गोरे यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. 

डॉ.  देवी म्हणाले की,भाषा वैविध्य जगवावंच लागेल. मातृभाषा वाचवणं, बोलणं, जपणं, त्यातील स्मृती पुढे नेणे, करुणामय सरकारे निर्माण करणे, हाच मार्ग होय व हेच आपले कर्तव्य होय. मी पृथ्वीचा पुत्र आहे. पृथ्वी माझ्या मालकीची नाही. स्मृती परंपरांना योग्य ते स्थान देऊन पृथ्वीवरच स्वर्ग कसा निर्माण करता येईल, हे बघणे महत्त्वाचे होय. विस्मृतीत चाललेले हे जग, स्मृतीवर अत्याचार करणारे हुकूमशाही पद्धतीची सरकारे याबद्दल देवी यांनी चिंता व्यक्त केली. आज संपूर्ण जग स्मृतिहीन होत आहे. कृत्रिम स्मृती वाढवून स्वत:ची स्मृती, शक्ती कमी केली जात आहे. जणू काळाबरोबर आपण वैर पत्करलंय. जगभर घाई झाली आहे. ऊर्जा, गती मिळवणं म्हणजे प्रगती होय, असे मानले जात आहे, असे ते म्हणाले.

जनगणना यंत्रणेमुळे भाषांचा लोपडॉ. देवी यांनी भाषांचा लोप जनगणना यंत्रणेमुळे होत आहे, असे स्पष्ट केले. २०११ च्या जनगणनेत ३६०० मातृभाषांची नावे पुढे आली. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील ५ कोटी २० लाख जनता भोजपुरी बोलते. परंतु सेन्ससने भोजपुरी ही हिंदीची पोटभाषा दाखविली. एकूण ६१ भाषा  हिंदीत मिसळून  या भाषांचं अस्तित्व सेन्ससनं नष्ट केलं. भाषा टिकवून ठेवण्यापेक्षा मारून टाकायला लोक आतुर झालेले आहेत. सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यSocialसामाजिक