शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गावातील रस्ता बंद केल्यावरून मागासवर्गीय दाम्पत्यास वाळीत टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:26 IST

पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड : तालुक्यातील वांजोला येथील एका मागासवर्गीय दाम्पत्याला गावातील रस्ता बंद केल्याच्या कारणावरून उपसरपंच व इतरांनी वाळीत टाकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील वांजोला येथील दीपक म्हातारजी सुरडकर (वय ६५ वर्षे) व कडूबाई दीपक सुरडकर (वय ६० वर्षे) व त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या घराशेजारचा रस्ता चारी खोदून बंद केला आहे. त्यामुळे तेथून इतर ग्रामस्थांना शेतात जाण्यास अडचण होत आहे, असे कारण देऊन २६ जून रोजी गावात दवंडी देऊन, सुरडकर परिवारास गावातील उपसरपंच रमेश काकडे व सुरडकर यांच्या भावकीतील व्यक्तींनी वाळीत टाकले.

त्यांच्या परिवारासोबत कोणीही बोलू नये, त्यांच्या घरी कोणीही जाऊ नये, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे समाजिक संबंध ठेवू नयेत, त्यांना बौद्ध विहारामध्ये प्रवेश देऊ नये, कुठल्याही दुकानातून सामान देऊ नये किंवा गावातील कुठल्याही व्यक्तींनी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारे व्यवहार करू नये, असे दवंडी देऊन गावात कळविल्याचा आरोप दीपक सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती. त्यानंतर, सर्व सुरळीत होईल, असे वाटत असल्याने तक्रार दिली नव्हती. मात्र, त्रास वाढल्याने २६ जुलै रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्याचे सुरडकर म्हणाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत उपसरपंच रमेश अर्जुन काकडे यांच्यासह १८ जणांची नावे आहेत.

तक्रारच आलेली नाही...गावात रस्त्यावरून काही वाद झाले होते. मात्र, त्या कुटुंबाला कुणी वाळीत टाकले, याची आमच्याकडे अजून तरी तक्रारच आलेली नाही. तक्रार आली, तर चौकशी केली जाईल.- सीताराम मेहेत्रे, पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

गावाच्या रस्त्याचा वाद आहेया इसमाने गावकऱ्यांचा रस्ताच चारी खोदून बंद केला होता. तो ग्रामपंचायतीमार्फत मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी बदला घेण्यासाठी खोटी तक्रार केली आहे.- रमेश काकडे उपसरपंच धानोरा-वांजोला ग्रुप ग्रामपंचायत.

शेतात राहतो..आम्ही गावाबाहेर शेतात राहतो. रस्त्याचा काही वाद नाही. त्यांनी माझ्या घरातूनच रस्ता काढला आहे. बोलायला गेलो, तर वाळीत टाकले आहे. याबाबत पोलिसांकडे एक महिन्यापासून तक्रार दाखल करण्यासाठी चकरा मारत आहे, परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता मानवी हक्क आयोग व पोलिसांना पोस्टद्वारे तक्रार पाठविली आहे.- दीपक म्हातारजी सुरडकर, पीडित.

हा तर गंभीर गुन्हा...असा प्रकार जर झाला असेल, तर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक यांच्याशी तत्काळ चर्चा करून कार्यवाही करण्यास सांगतो व जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई होईल.- विक्रम राजपूत, तहसीलदार, सिल्लोड.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा