शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

धक्कादायक! गावातील रस्ता बंद केल्यावरून मागासवर्गीय दाम्पत्यास वाळीत टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:26 IST

पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड : तालुक्यातील वांजोला येथील एका मागासवर्गीय दाम्पत्याला गावातील रस्ता बंद केल्याच्या कारणावरून उपसरपंच व इतरांनी वाळीत टाकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील वांजोला येथील दीपक म्हातारजी सुरडकर (वय ६५ वर्षे) व कडूबाई दीपक सुरडकर (वय ६० वर्षे) व त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या घराशेजारचा रस्ता चारी खोदून बंद केला आहे. त्यामुळे तेथून इतर ग्रामस्थांना शेतात जाण्यास अडचण होत आहे, असे कारण देऊन २६ जून रोजी गावात दवंडी देऊन, सुरडकर परिवारास गावातील उपसरपंच रमेश काकडे व सुरडकर यांच्या भावकीतील व्यक्तींनी वाळीत टाकले.

त्यांच्या परिवारासोबत कोणीही बोलू नये, त्यांच्या घरी कोणीही जाऊ नये, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे समाजिक संबंध ठेवू नयेत, त्यांना बौद्ध विहारामध्ये प्रवेश देऊ नये, कुठल्याही दुकानातून सामान देऊ नये किंवा गावातील कुठल्याही व्यक्तींनी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारे व्यवहार करू नये, असे दवंडी देऊन गावात कळविल्याचा आरोप दीपक सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती. त्यानंतर, सर्व सुरळीत होईल, असे वाटत असल्याने तक्रार दिली नव्हती. मात्र, त्रास वाढल्याने २६ जुलै रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्याचे सुरडकर म्हणाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत उपसरपंच रमेश अर्जुन काकडे यांच्यासह १८ जणांची नावे आहेत.

तक्रारच आलेली नाही...गावात रस्त्यावरून काही वाद झाले होते. मात्र, त्या कुटुंबाला कुणी वाळीत टाकले, याची आमच्याकडे अजून तरी तक्रारच आलेली नाही. तक्रार आली, तर चौकशी केली जाईल.- सीताराम मेहेत्रे, पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

गावाच्या रस्त्याचा वाद आहेया इसमाने गावकऱ्यांचा रस्ताच चारी खोदून बंद केला होता. तो ग्रामपंचायतीमार्फत मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी बदला घेण्यासाठी खोटी तक्रार केली आहे.- रमेश काकडे उपसरपंच धानोरा-वांजोला ग्रुप ग्रामपंचायत.

शेतात राहतो..आम्ही गावाबाहेर शेतात राहतो. रस्त्याचा काही वाद नाही. त्यांनी माझ्या घरातूनच रस्ता काढला आहे. बोलायला गेलो, तर वाळीत टाकले आहे. याबाबत पोलिसांकडे एक महिन्यापासून तक्रार दाखल करण्यासाठी चकरा मारत आहे, परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता मानवी हक्क आयोग व पोलिसांना पोस्टद्वारे तक्रार पाठविली आहे.- दीपक म्हातारजी सुरडकर, पीडित.

हा तर गंभीर गुन्हा...असा प्रकार जर झाला असेल, तर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक यांच्याशी तत्काळ चर्चा करून कार्यवाही करण्यास सांगतो व जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई होईल.- विक्रम राजपूत, तहसीलदार, सिल्लोड.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा