शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:08 IST

रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीची शिल्पकार शिवसेनाच असल्याचे मागील दहा वर्षांपासून नेते सांगत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविणारा प्रकल्प राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लागत आहे. त्यात अडथळे आणण्याचे कामही स्थानिक सेना नेते करीत आहेत. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सेना ठराव मंजूर करण्याच्या बाजूने होती. रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात समांतरच्या मुद्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी अधिकाऱ्यांसह महापौरही उपस्थित होते. महापौरांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की, २७ आॅगस्ट रोजी समांतरचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत महापौरांनीच निधीचा मुद्दाही उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही निधीची अजिबात चिंता करू नका, राज्य शासन सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त ठरावावर निर्णय घ्या, असे नमूद केले होते.एकीकडे मुख्यमंत्र्यांना ठराव मंजूर करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

दुसरीकडे सर्वसाधारण सभेत शेवटच्या घटकेला निर्णय बदलला. सेनेला राज्य शासनावर विश्वास का नाही.? यापूर्वी १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले. ९० कोटी रुपये घनकचऱ्यासाठी दिले. २४ कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले. समांतरसाठी शासन निधी देण्यास तयार आहे. १०० कोटी रुपये रस्त्यांचे खर्च होताच आणखी १०० कोटी रुपये देण्याची भूमिका शासनाची आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असताना सेनेने शासनावर दाखविलेला अविश्वास चुकीचा असल्याचे विजय औताडे यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

सेनेने शहराला वेठीस धरलेसमांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात अडथळे कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात येत आहेत, हे जनतेलाही आता कळून चुकले आहे. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना रिमोटचे बटन कोणी दाबले हे आम्ही सांगण्याची गरज नाही. समांतर प्रकल्प मीच आणला, आपणच याचे शिल्पकार आहोत, असे वारंवार सांगणाऱ्या सेना नेत्यांनीच महापौरांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याचा आरोपही उपमहापौरांनी केला.

भेट हवी का गळाभेट...समांतरचा ठराव मंजूर करण्यासाठी सेना नेत्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कशासाठी भेट घ्यावी. निव्वळ भेट घेऊन चालणार नाही, त्यांना गळाभेट हवी आहे, असा आरोपही उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार