शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:08 IST

रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीची शिल्पकार शिवसेनाच असल्याचे मागील दहा वर्षांपासून नेते सांगत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविणारा प्रकल्प राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लागत आहे. त्यात अडथळे आणण्याचे कामही स्थानिक सेना नेते करीत आहेत. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सेना ठराव मंजूर करण्याच्या बाजूने होती. रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात समांतरच्या मुद्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी अधिकाऱ्यांसह महापौरही उपस्थित होते. महापौरांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की, २७ आॅगस्ट रोजी समांतरचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत महापौरांनीच निधीचा मुद्दाही उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही निधीची अजिबात चिंता करू नका, राज्य शासन सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त ठरावावर निर्णय घ्या, असे नमूद केले होते.एकीकडे मुख्यमंत्र्यांना ठराव मंजूर करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

दुसरीकडे सर्वसाधारण सभेत शेवटच्या घटकेला निर्णय बदलला. सेनेला राज्य शासनावर विश्वास का नाही.? यापूर्वी १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले. ९० कोटी रुपये घनकचऱ्यासाठी दिले. २४ कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले. समांतरसाठी शासन निधी देण्यास तयार आहे. १०० कोटी रुपये रस्त्यांचे खर्च होताच आणखी १०० कोटी रुपये देण्याची भूमिका शासनाची आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असताना सेनेने शासनावर दाखविलेला अविश्वास चुकीचा असल्याचे विजय औताडे यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

सेनेने शहराला वेठीस धरलेसमांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात अडथळे कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात येत आहेत, हे जनतेलाही आता कळून चुकले आहे. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना रिमोटचे बटन कोणी दाबले हे आम्ही सांगण्याची गरज नाही. समांतर प्रकल्प मीच आणला, आपणच याचे शिल्पकार आहोत, असे वारंवार सांगणाऱ्या सेना नेत्यांनीच महापौरांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याचा आरोपही उपमहापौरांनी केला.

भेट हवी का गळाभेट...समांतरचा ठराव मंजूर करण्यासाठी सेना नेत्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कशासाठी भेट घ्यावी. निव्वळ भेट घेऊन चालणार नाही, त्यांना गळाभेट हवी आहे, असा आरोपही उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार