शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:08 IST

रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीची शिल्पकार शिवसेनाच असल्याचे मागील दहा वर्षांपासून नेते सांगत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविणारा प्रकल्प राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लागत आहे. त्यात अडथळे आणण्याचे कामही स्थानिक सेना नेते करीत आहेत. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सेना ठराव मंजूर करण्याच्या बाजूने होती. रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात समांतरच्या मुद्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी अधिकाऱ्यांसह महापौरही उपस्थित होते. महापौरांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की, २७ आॅगस्ट रोजी समांतरचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत महापौरांनीच निधीचा मुद्दाही उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही निधीची अजिबात चिंता करू नका, राज्य शासन सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त ठरावावर निर्णय घ्या, असे नमूद केले होते.एकीकडे मुख्यमंत्र्यांना ठराव मंजूर करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

दुसरीकडे सर्वसाधारण सभेत शेवटच्या घटकेला निर्णय बदलला. सेनेला राज्य शासनावर विश्वास का नाही.? यापूर्वी १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले. ९० कोटी रुपये घनकचऱ्यासाठी दिले. २४ कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले. समांतरसाठी शासन निधी देण्यास तयार आहे. १०० कोटी रुपये रस्त्यांचे खर्च होताच आणखी १०० कोटी रुपये देण्याची भूमिका शासनाची आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असताना सेनेने शासनावर दाखविलेला अविश्वास चुकीचा असल्याचे विजय औताडे यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

सेनेने शहराला वेठीस धरलेसमांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात अडथळे कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात येत आहेत, हे जनतेलाही आता कळून चुकले आहे. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना रिमोटचे बटन कोणी दाबले हे आम्ही सांगण्याची गरज नाही. समांतर प्रकल्प मीच आणला, आपणच याचे शिल्पकार आहोत, असे वारंवार सांगणाऱ्या सेना नेत्यांनीच महापौरांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याचा आरोपही उपमहापौरांनी केला.

भेट हवी का गळाभेट...समांतरचा ठराव मंजूर करण्यासाठी सेना नेत्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कशासाठी भेट घ्यावी. निव्वळ भेट घेऊन चालणार नाही, त्यांना गळाभेट हवी आहे, असा आरोपही उपमहापौर विजय औताडे यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार