शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

शिवराय ते भीमराय सद्भावना रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:47 PM

‘भिंत पाडा द्वेषाची.... इमारत बांधा प्रेमाची,’ असा संदेश देण्यासाठी आज औरंगाबादेत शिवराय ते भीमराय सद्भावना मूक रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथील १ जानेवारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ अमलात आणा,’ असे देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यासाठी व ‘भिंत पाडा द्वेषाची.... इमारत बांधा प्रेमाची,’ असा संदेश देण्यासाठी आज औरंगाबादेत शिवराय ते भीमराय सद्भावना मूक रॅली काढण्यात आली. भगवे, निळे, हिरवे, पिवळे व लाल रंगाचे झेंडे या निमित्ताने एकत्र डौलाने फडकताना दिसून आले.दुपारी मुलींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिस्तबद्ध रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी हातात घोषफलक घेऊन महिला चालत होत्या. कॉ. बुद्धप्रिय कबीर यांच्या हातात तिरंगा ध्वज होता, तर प्रा. माणिक सावंत हे व्हीलचेअरवर बसून ‘कृपया समाजात आग लावू नका, कदाचित ही आग तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकते,’ असा संदेश देत होते. रॅलीच्या अग्रभागी बुद्ध ते मौलाना आझाद यांच्यापर्यंतच्या महामानवांच्या प्रतिमांचे भलेमोठे बॅनर धरून महिला चालत होत्या.एका वाहनात बसून अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे हे ध्वनिक्षेपकावरून योग्य त्या सूचना देत होते. रॅलीत संभाजी ब्रिगेड, जमात- ए- इस्लामी, तंजीम- ए- इन्साफ, बळीराजा शेतकरी संघटना, बसपा, भीमशक्ती, भारिप-बहुजन महासंघ, राष्टÑीय मराठा महासंघ, स्वाभिमानी अ.भा. छावा, अ.भा. शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू, आयटक, एसएफआय, एआयवायएफ, अ.भा. छावा, शिवप्रहार, स्वराज इंडिया, संभाजी सेना, मूलनिवासी संघ, फुले- शाहू- आंबेडकर विचार प्रबोधन परिषद, छावा, बुलंद छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, रिपाइं गवई गट, भीम आर्मी, मुप्टा, बामसेफ, महात्मा फुले युवा दल, जनता दल सेक्युलर, जिवा सेना, एसआयओ, समता विद्यार्थी आघाडी, बीआरपी, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, भीमशक्ती कर्मचारी युनियन, सत्यशोधक समाज, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्टÑ क्रांती सेना आदी पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.रॅलीत अत्यंत बोलके फलक झळकत होते.‘ हे राज्य आहे शिवरायांचे, फुले- शाहू- भीमरायांचे’, ‘फडणवीस राजीनामा द्या’, ‘आम्हा सर्वांचे पूर्वज एक, मानव आम्ही सर्व एक’, ‘संभाजी भिडे... मिलिंद एकबोटेचे उदात्तीकरण बंद करा’, ‘आम्हीच येथे जातीयतेचे तोडू सारे बंधन, नको विषमता, हवी सुखशांती’ यासारख्या घोषवाक्यांतून योग्य संदेश दिले जात होते.क्रांतीचौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, मिल कॉर्नर, ज्युबिलीपार्कमार्गे भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली आली. तेथे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोरेगाव-भीमाच्या दंगलीमुळे मृत झालेल्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वाती नखाते या मुलीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहिलेले निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर राष्टÑगीत होऊन रॅलीची सांगता झाली. कॉ. राम बाहेती यांनी सूत्रसंचालन केले.कॉ. मनोहर टाकसाळ, प्र.ज. निकम गुरुजी, गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे, अ‍ॅड. अंकुश भालेकर, पृथ्वीराज पवार, कदीर मौलाना, के.ई. हरिदास, कॉ. भीमराव बनसोड, कॉ. पंडित मुंडे, कॉ. बुद्धिनाथ बराळ, कॉ. उद्धव भवलकर, दिनकर ओंकार, रतनकुमार पंडागळे, गौतम लांडगे, अ‍ॅड. जे.के. नारायणे, श्रीरंग ससाणे, किशोर म्हस्के, उत्तम शिंदे, तनुजा जोशी, योगेश खोसरे, मंगल ठोंबरे, मंगल खिंवसरा, कॉ. अभय टाकसाळ, साथी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, इंजि. वाजीद कादरी, एस.जी. शुत्तारी, नासेर नदवी, साजीद मौलाना, कॉ. सांडू जाधव, तारा बनसोडे, माया भिवसने, मनीषा भोळे, सोनाली म्हस्के, साळूबाई दांडगे, जयश्री शिर्के, भावना खोब्रागडे, निर्मला साळवे, पंचशीला साळवे, अर्चना बामणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत समाविष्ट झाले होते.