शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:43 IST

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती.

औरंगाबाद: जिल्ह्यात  झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे डाव शिंदे सेनेतील आ. संजय शिरसाट , संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रणनीती पुढे निष्प्रभ ठरले. बंडखोरी नंतर झालेल्या पहिल्याच परीक्षेत शिंदे गटाने वर्चस्व मिळवल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, सिल्लोड आणि औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. या तिन्ही ठिकाणच्या ग्राम पंचायत निकालात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाल आहे. जिल्ह्यातील सेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. याला तेवढ्यात तोडीची रणनीती आखून प्रत्युत्तर आ. शिरसाट, सत्तार आणि भुमरे यांनी दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. 

थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १७ जागा होत्या. यातील तब्बल ११ जागा जिंकत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला आहे. येथे शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला दोन जागा मिळाल्या. 

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये तीन ग्राम पंचायतीसाठी निवडणूक झाली. नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. 

तसेच संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे