शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:43 IST

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती.

औरंगाबाद: जिल्ह्यात  झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे डाव शिंदे सेनेतील आ. संजय शिरसाट , संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रणनीती पुढे निष्प्रभ ठरले. बंडखोरी नंतर झालेल्या पहिल्याच परीक्षेत शिंदे गटाने वर्चस्व मिळवल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, सिल्लोड आणि औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. या तिन्ही ठिकाणच्या ग्राम पंचायत निकालात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाल आहे. जिल्ह्यातील सेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. याला तेवढ्यात तोडीची रणनीती आखून प्रत्युत्तर आ. शिरसाट, सत्तार आणि भुमरे यांनी दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. 

थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १७ जागा होत्या. यातील तब्बल ११ जागा जिंकत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला आहे. येथे शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला दोन जागा मिळाल्या. 

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये तीन ग्राम पंचायतीसाठी निवडणूक झाली. नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. 

तसेच संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे