शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:47 IST

स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा अभेद्य गड आता भाजपचे झालेय सत्ताकेंद्रभाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय?शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु

- विकास राऊत

औरंगाबाद : शिवसेचा अभेद्य गड राहिलेले औरंगाबाद आता भाजपचे सत्ताकेंद्र झाले आहे. केंद्रातील दोन राज्यमंत्री औरंगाबाद आणि जालना - औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघातून असल्यामुळे या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व भाजपने वाढविले आहे. परिणामी शिवसेनेत आता मंथन सुरू झाले असून, लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी शिवसेना नेते परिश्रम घेत आहेत. एकंदरीत भाजप जिल्ह्यासाठी व्यूहरचना आखत असल्यामुळे शिवसेनेने याबाबत मंथन सुरू केले आहे.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा युतीमध्ये लढल्या गेल्या. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभेचे औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे मतदारसंघ राखता आले, तर भाजपला पूर्व, फुलंब्री आणि गंगापूरच्या जागा मिळाल्या. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हात दिल्यामुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचा आरोप सेनेने वारंवार केला.

शिवसेना-भाजपची जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत १९८८ पासून असलेली युती २०१४ ला विधानसभा निवडणुकीत तुटली. निवडणुकीनंतर पुन्हा युती झाली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती झाली. परंतु, त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेची समीकरणे बदलली. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करीत सत्ता मिळविली. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका भाजप स्वतंत्र लढण्याच्या हेतूने मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्याला सत्तेच्या अग्रस्थानी आणल्याचे बोलले जात आहे.

भाजप लोकसभा निवडणूक लढणार काय?केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपदी स्थान मिळाले, तर रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. यामुळे भाजप संघटनेस निश्चित बळ मिळणारच आहे. त्यामुळे शिवसेनेतील लोकसभा लढू इच्छिणाऱ्यांनी भाजपमधील आपल्या मित्रांना भाजपची पुढची रणनीती काय असेल. स्वतंत्र लढण्याबाबत भाजप तयारी करीत आहे काय? याचा कानोसा घेणे सुरू केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. जिल्ह्यात युतीविना विजय शक्य नसल्यामुळे भाजप कोणाला उमेदवार म्हणून तयार करीत आहे, यावर सेना इच्छुक बारकाईने लक्ष ठेवून आहे.

शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियानस्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे. पुढच्या वर्षी जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होण्याचे निश्चित झाल्यास भाजपसह महाविकास आघाडीसोबत सूत जुळणार नाही हे गृहीत धरून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवेMarathwadaमराठवाडा