शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भाजपच्या मंत्रीपदाने शिवसेनेत चिंता; लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:47 IST

स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा अभेद्य गड आता भाजपचे झालेय सत्ताकेंद्रभाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय?शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु

- विकास राऊत

औरंगाबाद : शिवसेचा अभेद्य गड राहिलेले औरंगाबाद आता भाजपचे सत्ताकेंद्र झाले आहे. केंद्रातील दोन राज्यमंत्री औरंगाबाद आणि जालना - औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघातून असल्यामुळे या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व भाजपने वाढविले आहे. परिणामी शिवसेनेत आता मंथन सुरू झाले असून, लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी शिवसेना नेते परिश्रम घेत आहेत. एकंदरीत भाजप जिल्ह्यासाठी व्यूहरचना आखत असल्यामुळे शिवसेनेने याबाबत मंथन सुरू केले आहे.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा युतीमध्ये लढल्या गेल्या. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभेचे औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे मतदारसंघ राखता आले, तर भाजपला पूर्व, फुलंब्री आणि गंगापूरच्या जागा मिळाल्या. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हात दिल्यामुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचा आरोप सेनेने वारंवार केला.

शिवसेना-भाजपची जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत १९८८ पासून असलेली युती २०१४ ला विधानसभा निवडणुकीत तुटली. निवडणुकीनंतर पुन्हा युती झाली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती झाली. परंतु, त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेची समीकरणे बदलली. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करीत सत्ता मिळविली. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका भाजप स्वतंत्र लढण्याच्या हेतूने मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्याला सत्तेच्या अग्रस्थानी आणल्याचे बोलले जात आहे.

भाजप लोकसभा निवडणूक लढणार काय?केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपदी स्थान मिळाले, तर रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. यामुळे भाजप संघटनेस निश्चित बळ मिळणारच आहे. त्यामुळे शिवसेनेतील लोकसभा लढू इच्छिणाऱ्यांनी भाजपमधील आपल्या मित्रांना भाजपची पुढची रणनीती काय असेल. स्वतंत्र लढण्याबाबत भाजप तयारी करीत आहे काय? याचा कानोसा घेणे सुरू केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. जिल्ह्यात युतीविना विजय शक्य नसल्यामुळे भाजप कोणाला उमेदवार म्हणून तयार करीत आहे, यावर सेना इच्छुक बारकाईने लक्ष ठेवून आहे.

शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियानस्वबळावर निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यांत कार्यकर्ते संपर्क अभियान सुरू केले आहे. पुढच्या वर्षी जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होण्याचे निश्चित झाल्यास भाजपसह महाविकास आघाडीसोबत सूत जुळणार नाही हे गृहीत धरून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवेMarathwadaमराठवाडा