शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

"...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात," सुभाष देसाईंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 12:23 IST

औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," देसाई यांनी व्यक्त केला विश्वास.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. यात ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, महाराष्ट्रानं अशा भरपूर सुपारी सभा पाहिल्या आहेत, असं म्हणत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बोचरी टीका केली. तसंच भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात समजेल असंही ते म्हणाले.

"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही," असं सुभाष देसाई म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

"कोणीही काही नवे कार्यक्रम घेतायत ते पाहावं लागेल. आधी मराठी मराठी केलं, आता भोंगा भोंगा आहे. आता भोंगा आणि कमळाचं नातं झालेलं आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात कळेल. महाराष्ट्रानं अशा अनेक सुपारी सभा पाहिल्या आहेत. त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकेल हे पाहण्यास जनता आणि मी उत्सुक आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

आतापर्यंत सर्व संकटं आली त्यात पोलिसांनी प्रशासनानं चांगली कामगिरी बजावली आणि जनतेला संकटातून बाहेर येण्यास वेळोवेळी मदतही केली आहे. काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतलीये. औरंगाबादच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही, जनता सुज्ञ आहे, कोणीही किती चिथावणी दिली तरी आपली डोकी भडकवून घेणार नाही, याची खात्री आहे. जे बंधुभावाचं नातं कायम ठेवलंय त्याचं जतन करायचं आहे. कोण काय करतं याकडे जनता चाणक्षपणे पाहत असल्याचंही देसाई म्हणाले.

औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे आणि राहणार"बाबरी मशिद पाडल्यानंतर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही. अगोदर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. राज्यात लवकरच मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळेल. भाजपने मनसेला सुपारी देऊन ही सभा आयोजित केली आहे, मात्र आशा सुपारी सभेचा शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई