शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

"...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात," सुभाष देसाईंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 12:23 IST

औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," देसाई यांनी व्यक्त केला विश्वास.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. यात ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, महाराष्ट्रानं अशा भरपूर सुपारी सभा पाहिल्या आहेत, असं म्हणत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बोचरी टीका केली. तसंच भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात समजेल असंही ते म्हणाले.

"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही," असं सुभाष देसाई म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

"कोणीही काही नवे कार्यक्रम घेतायत ते पाहावं लागेल. आधी मराठी मराठी केलं, आता भोंगा भोंगा आहे. आता भोंगा आणि कमळाचं नातं झालेलं आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात कळेल. महाराष्ट्रानं अशा अनेक सुपारी सभा पाहिल्या आहेत. त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकेल हे पाहण्यास जनता आणि मी उत्सुक आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

आतापर्यंत सर्व संकटं आली त्यात पोलिसांनी प्रशासनानं चांगली कामगिरी बजावली आणि जनतेला संकटातून बाहेर येण्यास वेळोवेळी मदतही केली आहे. काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतलीये. औरंगाबादच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही, जनता सुज्ञ आहे, कोणीही किती चिथावणी दिली तरी आपली डोकी भडकवून घेणार नाही, याची खात्री आहे. जे बंधुभावाचं नातं कायम ठेवलंय त्याचं जतन करायचं आहे. कोण काय करतं याकडे जनता चाणक्षपणे पाहत असल्याचंही देसाई म्हणाले.

औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे आणि राहणार"बाबरी मशिद पाडल्यानंतर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही. अगोदर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. राज्यात लवकरच मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळेल. भाजपने मनसेला सुपारी देऊन ही सभा आयोजित केली आहे, मात्र आशा सुपारी सभेचा शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई