शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
4
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
5
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
6
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
7
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
8
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
9
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
10
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
13
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
14
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
15
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
16
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
17
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
18
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
19
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
20
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:42 IST

महाविकास आघाडीचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा पॅटर्न यशस्वी झाल्याने सेनेच्या अपेक्षांना पाझर

औरंगाबाद : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाल्यामुळे आगामी विधानसभेत असाच पॅटर्न तिन्ही पक्षांकडून राबविला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या चर्चेत शिवसेनेच्या अपेक्षांना पाझर फुटला असून आतापासूनच शिवसेना पूर्व मतदारसंघात कामाला लागली आहे. भाजपच्या प्रत्येक डावपेचाला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. विधानसभा तर दूरच; परंतु महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्येही सोशल वॉर सुरू आहे. यात दोन्ही पक्षांचे इच्छुक आघाडीवर आहेत.

आंदोलने, होर्डिंग्ज वॉर, पाणीपुरवठ्यावरून सुरू असलेल्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे. जिथे भाजपचे आंदोलन, तेथे शिवसेनेचे सोल्यूशन असा प्रकार सुरू असून आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढेल, असे चित्र सध्या तरी आहे. याशिवाय महापुरुषांच्या जयंती, महाप्रसाद, विविध समाजोपयोगी शिबिर घेण्यासाठी दोन्ही पक्षांत स्पर्धा लागलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघात सध्या तरी कुठेही दिसत नाही. तर एमआयएमचे त्यांच्या ‘व्होट पॉकेट’मध्ये काम सुरू आहे.

२००९ पासून २०१९ पर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकदा तर भाजपला दोन वेळा विजय मिळाला आहे. यात शिवसेनेला आजवर संधी मिळालेली नाही. त्यामुळे २०२४ मध्ये शिवसेनेकडून संधी मिळण्यासाठी माजी सभापती राजू वैद्य तयारी करीत आहेत. तर विद्यमान भाजपचे आ.अतुल सावे यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येण्याचे संकेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विजयामुळे मिळाल्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या असून वैद्य यांनी यंदाच्या वाढदिवसाला पूर्ण जाेर लावला.

आ. सावेंचे चार कोटी तर वैद्य यांचे साडेतीन कोटीआ. अतुल सावे यांनी मतदारसंघात चार कोटी रुपयांची विकासकामे सरलेल्या आर्थिक वर्षात केली. तर राजू वैद्य यांनी देखील पक्ष आमदारांकडून साडेतीन कोटींचा निधी मतदारसंघात आणला. विकासकामांच्या या स्पर्धेत नागरी सुविधांमध्ये वाढ होत असली तरी २०२४ मध्ये काय समीकरण असेल, त्यावर सगळे काही अवलंबून आहे. सध्या मात्र दोन्ही पक्षांत प्रत्येक कार्यक्रम, आंदोलनावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद