शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:17 PM

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : दिल्लीला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज थांबले शहरात

ठळक मुद्देजयसिंगपुऱ्यातील हवेलीत राहिलेमहादेव मंदिरातही केली पूजा

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगाबादेत मुक्काम केला होता. महाराजांचे चरण या ऐतिहासिक भूमीला लागले होते. त्यावेळेस छत्रपतींना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याची माहिती ऐतिहासिक दस्तावेजांवरून स्पष्ट होत आहे. तत्कालीन औरंगाबाद शहरात शिवाजी महाराज जयसिंगपुऱ्यातील एका हवेलीमध्ये थांबले होते. ती जुनी हवेली सध्या अस्तित्वात नाही. तेथे एक अपार्टमेंट बांधले गेले आहे. मात्र, जिथे महाराजांनी पूजा केली होती ते  मंदिर आजही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभे आहे. 

छत्रपती शिवाजी राजे व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर शिवछत्रपतींनी आगरा येथे बादशहा औरंगजेबाच्या भेटीला जाण्याचे मान्य केले. त्यानुसार ५ मार्च १६६६ मध्ये राजगडाहून शिवाजी महाराज आगऱ्याला जाण्यासाठी निघाले. त्यांनी आपले पुत्र संभाजी महाराज यांना सोबत घेतले. संभाजीराजांचे वय अवघे ९ वर्षांचे होते. सोबत निवडक मनसबदार, घोडेस्वार आणि पायदळ घेऊन शिवछत्रपतींची स्वारी पुणे, अहमदनगर मार्गे औरंगाबादेत दाखल झाली होती. औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी त्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांना दिली होती. त्यांच्या निवासासाठी मकाईगेट परिसरात भव्य हवेली बांधली होती. असे म्हणतात की,  या हवेलीचे बांधकाम राजस्थानी शैलीचे होते.

जयसिंगराजाच्या नावावरूनच सध्याचा जयसिंगपुरा ओळखला जातो. या जयसिंगपुऱ्यात ही हवेली होती. या हवेलीतच शिवाजी महाराज थांबले होते.  ज्या शिवछत्रपतींची आपण ख्याती ऐकली त्या रयतेच्या राजाला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी त्यावेळेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, असे राजस्थानातील पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या ‘पुरंदरचा तह’च्या दस्तावेजात लिहिण्यात आले आहे. तसेच बखरीमध्येही या घटनेचा उल्लेख आहे, असे इतिहास अभ्यासकांनी सांगितले. 

शिवाजी महाराज व राजे जयसिंग हे शिवभक्त होते. राजे जयसिंग हवेलीच्या मागील बाजूस महादेव मंदिरात पूजेसाठी जात. त्याच महादेव मंदिरात शिवाजी महाराजांनी पूजा केली होती. तसेच या परिसरातील विठ्ठल रु क्मिणी मंदिरातही महाराजांनी दर्शन घेतले होते. औरंगाबादेतील मुक्कामानंतर महाराज बुºहाणपूर, भोपाळ मार्गे आगऱ्याला पोहोचले होते. उपलब्ध दस्तावेजानुसार महाराजांनी राजगड ते आगरा हा प्रवास ६६ दिवसांत पूर्ण केला. एवढेच नव्हे तर येथील महादेव मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांनी पूजाही केली होती. महाराजांनी मुक्काम केलेली ती हवेली सध्या अस्तित्वात नाही. तेथील शिवमंदिर अजूनही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत दिमाखात उभे आहे. 

दस्तावेजामध्ये महाराजांच्या शाहीस्वारीचे सजीव वर्णन महाराजांना पाहण्यासाठी तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असंख्य लोक जमले होते. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सैन्य थोडेच होते; पण शानदार होते. एक हत्ती उंच झेंडा घेऊन अग्रभागी चालत होता. महाराजांच्या पालखीला चांदीचे आवरण होते. या पालखीच्या पुढे व मागे संरक्षण करणारे घोडेस्वार व पायदळ सैनिक. या महाराजांच्या शाहीस्वारीचे सजीव वर्णन राजस्थानमधील दस्तावेजामध्ये करण्यात आले आहे. महाराजांच्या स्वागतासाठी त्यावेळचा येथील सुभेदार सफ शिकन खान आला नव्हता. त्याने आपल्या पुतण्याला पाठविले व महाराजालाच भेटायला बोलाविले. यामुळे शिवाजी महाराजांना शिकन खानचा राग आला आणि ते जयसिंगराजाच्या हवेलीकडे निघून गेले.  खानाला आपली चूक लक्षात आली व नंतर तो शिवाजी महाराजांना भेटण्यास जयसिंगराजाच्या हवेलीत गेला होता. त्याच्यासोबत काही मुगल अधिकारीही होते.  दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुभेदार खानची भेट घेतली होती. औरंगाबादच्या मुक्कामात शिवछत्रपतींनी काही मंदिरांत व येथील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या. शिवछत्रपतींच्या आगमनामुळे त्यानंतर जयसिंगपुरा सर्वत्र प्रसिद्ध झाला.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabadऔरंगाबाद