शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शहागंज ते हेडपोस्ट ऑफिस रस्त्याच्या ठिकऱ्या; शहर खड्ड्यात जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 14:55 IST

Aurangabad Municipal Corporation महापालिका प्रशासनाने जुन्या शहरात २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यानंतर महापालिकेने २०१२ मध्ये या रस्त्यावर तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये खर्च केले.

ठळक मुद्देया मार्गावर येणारे वाहनधारक प्रचंड त्रस्त बाजारात खरेदीस आलेल्या ग्राहकांनाही यातना

औरंगाबाद : शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून थेट हेडपोस्ट ऑफिसपर्यंतच्या ( Shahaganj to Head Post office Road In Bad Condition ) रस्त्याची सध्या अत्यंत विदारक अवस्था झाली आहे. महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) २०१२ मध्ये या रस्त्यावर तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. तीन वर्षांत रस्ता खराब झाला, तर परत मोफत डागडुजी करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती; मात्र मागील दोन-तीन वर्षांमध्ये रस्ता खराब झाला. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागतोय.

महापालिका प्रशासनाने जुन्या शहरात २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यानंतर रस्त्यांची कामे महापालिका निधीतून करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. निविदा प्रक्रियेला एकही कंत्राटदार प्रतिसाद देत नव्हता. शेवटी शहरातील कंत्राटदारांची तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बैठक बोलावून प्रत्येक कंत्राटदाराला कामे करण्याचे निर्देश दिले. शहागंज ते भडकलगेट रस्त्यासाठी अरोरा कन्स्ट्रक्शन, चंद्राम आशन्ना यांची नेमणूक करण्यात आली. अंदाजपत्रकीय दरापेक्षा ६.१२ टक्के अधिक दराने हे काम देण्यात आले. ४ कोटी ९१ लाख ३९ हजार या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ठरविण्यात आली होती. अरोरा कन्स्ट्रक्शनला ३ कोटी १३ लाख तर चंद्राम आशन्ना यांना १ कोटी ५० लाखांचे काम दिले. नियोजित वेळेत कंत्राटदारांनी कामही पूर्ण केले. प्रारंभी काही वर्षे रस्ता चांगला गुळगुळीत होता. ३ वर्षांनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले. मनपाने तात्पुरती सोय म्हणून दरवर्षी डांबरी रस्त्यावर सिमेंट मटेरियल वापरून खड्डे बुजविण्याचा अघोरी प्रयोग केला. त्यामुळे रस्त्याची आणखी वाईट अवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी मनपाने शासन अनुदानातून भडकलगेट ते हेडपोस्ट ऑफिस कॉर्नरपर्यंतचा रस्ता सिमेंट पद्धतीने तयार केला. त्यामुळे वाहनधारकांना किचिंत दिलासा मिळालेला आहे.

३१७ कोटींत या रस्त्याचा समावेशमहाराष्ट्र शासनाकडून शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून ३१७ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर शहागंज ते हेडपोस्ट ऑफिस हा रस्ताही गुळगुळीत करण्यात येणार आहे. रस्त्याचा सरफेस बराच खराब झालेला आहे.- एस.डी. पानझडे, शहर अभियंता, मनपा.

निकषानुसार काम पूर्णगांधीपुतळा ते लेबर कॉलनी या रस्त्याचे काम मला मनपाने दिले नव्हते. हे काम आदिनाथ कन्स्ट्रक्शन यांनी केले होते. मला मनपाने गांधी पुतळा ते भडकलगेट रस्त्याचे काम दिले होते. मनपाच्या सर्व निकषानुसार मी काम तेव्हाच पूर्ण केले. रस्त्याच्या गुणवत्तेची मुदत तीन वर्षे होती. या कालावधीत रस्ता चांगला होता. अलीकडेच रस्ता खराब झाला.- विजय अरोरा, अरोरा कन्स्ट्रक्शन

१५ मीटर रुंद रस्ता१५०० मीटर लांब२०१२ मध्ये केले काम०९ वर्षांत मनपाचे रस्त्याकडे दुर्लक्ष

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका