शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अनेक तलाठी एकाच उपविभागात सहा वर्षांपासून ठाण मांडून; जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती पत्रांचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 20:04 IST

पहिल्या टप्प्यात ११५ जणांच्या बदल्या होणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना एकाच उपविभागात सहा वर्षांचा कालावधी झाला असून, त्यांच्या बदल्या होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीला अद्याप विभागीय प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कुणाची कुठे बदली झाली हे समोर आलेले नाही. दरम्यान, बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्जांचा ढीग लागला. शहर व परिसरात अनेक तलाठी मागील सहा वर्षांहून अधिक काळापासून येथेच ठाण मांडून आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बदल्यांचे अधिकार असताना अनेक जण आपल्या सोयीनुसार बदल्या करून घेतात. परंतु, जे तलाठी ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांना मात्र शहरात येण्याची संधीच मिळाली नाही. सहा वर्षांपर्यंतचा कालावधी एकाच ठिकाणी काढला की, पदोन्नती होऊन पुन्हा त्याच उपविभागात बदली करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातून अनेकांचे लागेबांधे वाढतात. त्यामुळे त्यांना बदली नकोशी वाटते.

इतरांना तीन वर्षांचा नियममहसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतरांना तीन वर्षांचा बदलीचा नियम आहे. परंतु, तलाठ्यांना एकाच तालुक्यात सहा वर्षे का ठेवावे, त्यांचीही तीन वर्षांनी बदली का करू नये, असा प्रश्न आहे. अनेक तलाठी कार्यालयात नसतात. हाताखालील कर्मचारीच कामकाज पाहतात. फेर घेण्यास तलाठी टाळाटाळ करतात. १५ ते ३० दिवसांचा नियम असताना, तीन-तीन महिने फेर मंजूर करीत नाहीत. हीदेखील वस्तुस्थिती आहे.

अध्यक्षांचा मेसेज व्हायरलमहसूलमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही. तथापि आम्ही इतर मागण्यांसाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला. तलाठी बदल्यांबाबत सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटावे. तीन वर्षांच्या आत काळ झालेल्या सजावरून बदली करू नये. तालुक्यात सहा वर्षे झाल्याशिवाय बदली होणार नाही. यासाठी प्रशासनाकडे आग्रही राहून पाठपुरावा करावा. जास्तीत जास्त सभासदांना न्याय मिळवून द्यावा, असा मेसेज राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या नावे सोशल मीडियातून सगळ्या तलाठी संघटनांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला.

११५ जणांच्या बदल्या होतीलएकूण पदांच्या ३० टक्के तलाठ्यांच्या बदल्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम केलेली यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मंजुरी मिळताच लगेच बदलीचे आदेश जारी केले जातील.- विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली