शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अनेक तलाठी एकाच उपविभागात सहा वर्षांपासून ठाण मांडून; जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती पत्रांचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 20:04 IST

पहिल्या टप्प्यात ११५ जणांच्या बदल्या होणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना एकाच उपविभागात सहा वर्षांचा कालावधी झाला असून, त्यांच्या बदल्या होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीला अद्याप विभागीय प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कुणाची कुठे बदली झाली हे समोर आलेले नाही. दरम्यान, बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्जांचा ढीग लागला. शहर व परिसरात अनेक तलाठी मागील सहा वर्षांहून अधिक काळापासून येथेच ठाण मांडून आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बदल्यांचे अधिकार असताना अनेक जण आपल्या सोयीनुसार बदल्या करून घेतात. परंतु, जे तलाठी ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांना मात्र शहरात येण्याची संधीच मिळाली नाही. सहा वर्षांपर्यंतचा कालावधी एकाच ठिकाणी काढला की, पदोन्नती होऊन पुन्हा त्याच उपविभागात बदली करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातून अनेकांचे लागेबांधे वाढतात. त्यामुळे त्यांना बदली नकोशी वाटते.

इतरांना तीन वर्षांचा नियममहसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतरांना तीन वर्षांचा बदलीचा नियम आहे. परंतु, तलाठ्यांना एकाच तालुक्यात सहा वर्षे का ठेवावे, त्यांचीही तीन वर्षांनी बदली का करू नये, असा प्रश्न आहे. अनेक तलाठी कार्यालयात नसतात. हाताखालील कर्मचारीच कामकाज पाहतात. फेर घेण्यास तलाठी टाळाटाळ करतात. १५ ते ३० दिवसांचा नियम असताना, तीन-तीन महिने फेर मंजूर करीत नाहीत. हीदेखील वस्तुस्थिती आहे.

अध्यक्षांचा मेसेज व्हायरलमहसूलमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही. तथापि आम्ही इतर मागण्यांसाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला. तलाठी बदल्यांबाबत सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटावे. तीन वर्षांच्या आत काळ झालेल्या सजावरून बदली करू नये. तालुक्यात सहा वर्षे झाल्याशिवाय बदली होणार नाही. यासाठी प्रशासनाकडे आग्रही राहून पाठपुरावा करावा. जास्तीत जास्त सभासदांना न्याय मिळवून द्यावा, असा मेसेज राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या नावे सोशल मीडियातून सगळ्या तलाठी संघटनांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला.

११५ जणांच्या बदल्या होतीलएकूण पदांच्या ३० टक्के तलाठ्यांच्या बदल्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम केलेली यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मंजुरी मिळताच लगेच बदलीचे आदेश जारी केले जातील.- विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली