शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

सलग तीन वर्षांपासून बारगळल्या ‘समाजकल्याण’च्या अनेक योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:20 PM

योजनांमध्ये सतत बदल करण्याच्या मानसिकतेमुळे अडले घोडे 

ठळक मुद्देवैयक्तिक लाभाच्या योजनांचा एकूण १५ ते १६ कोटी रुपयांचा निधी अखर्चित योजना बदलल्यामुळे वेळेत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त होत नाहीत.

औरंगाबाद : सतत योजनांमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमुळे सलग तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या उपकरातून समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा एकूण १५ ते १६ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. किमान यापुढे तरी योजना मार्गी लागण्यासाठी सदस्य-पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

दरम्यान, अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या योजना रद्द करणे किंवा योजनांचा निधी कमी करून तो दुसऱ्या योजनेवर (पुनर्विनियोजन) खर्च करण्यासाठी सदस्यांकडून आग्रह धरला जातो. यानुसार सलग तीन वर्षे योजना बदलल्यामुळे वेळेत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त होत नाहीत. समाजकल्याण विषय समितीमध्ये लाभार्थ्यांच्या निवडीला विरोध होणे, त्यामुळे मार्चअखेरपर्यंत या विभागाला लाभार्थी निश्चित करता येत नाहीत. 

मागील तीन-चार वर्षांपासून ‘डीबीटी’ तत्त्वावर या योजना राबविल्या जात असल्यामुळे लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या पावत्यांसह त्यांच्याकडून अनुदान वितरणासाठी प्रस्ताव प्राप्त होत नाहीत. परिणामी, त्या- त्या वर्षात योजनांसाठी करण्यात आलेली तरतूद अखर्चित राहत आहे.  मागील वर्षी ३१ आॅक्टोबर २०१८ मध्ये समाजकल्याण विभागाच्या योजनांच्या पुनर्नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत मूळ अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या १० योजना रद्द करण्यात आल्या, तर रद्द करण्यात आलेल्या योजनांची तरतूद नवीन ११ योजनांसाठी करण्यात आली होती. 

या बैठकीत रद्द करण्यात आलेल्या योजनांपैकी दलित वस्त्यांना कचराकुंडी वाटप करणे, अनुदानित वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच, दुग्ध व्यवसायासाठी गाय- म्हैस पुरविणे, ग्रीन जीम, रेशीम शेतीसाठी अर्थसाह्य, सोलार वॉटर हिटर पुरविणे, योजना राबविण्यासाठी प्रशासकीय खर्च, प्रचार व प्रसिद्धीसाठी खर्च, समाजकल्याण कार्यालयाचे बळकटीकरण आदी दहा योजना रद्द करण्यात आल्या.

रद्द करण्यात आलेल्या योजनांचा निधी झेरॉक्स मशीन, संगणक वाटप, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मोफत ग्रंथालय, पीव्हीसी पाईप, लोखंडी पत्रे, पिको फॉल मशीन, पिठाच्या गिरण्या, इलेक्ट्रिक मोटार, अनुदानित वसतिगृहांच्या अनुदान, कडबा कटर यंत्र, सायकल वाटप आदी योजनांसाठी वाढवून देण्यात आला. या प्रक्रियेत मागील आर्थिक वर्षात अर्धाच निधी खर्च होऊ शकला.

अन्याय केल्याचा प्रश्नच नाही!यासंदर्भात ३० एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी खंत व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेच्या उपकरातून समाजकल्याण विभागाला २० टक्के निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात मागील अनुशेषासह ६ कोटी १२ लाख ६३ हजार रुपये, २०१७-१८ या वर्षात ३ कोटी ८३ लाख ६७ हजार रुपये व २०१८-१९ मध्ये ५ कोटी ६० लाख २ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या तिन्ही वर्षांचा एकूण १५ ते १६ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना