शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

सात वर्षांत केवळ खोटी भाषणे अन आश्वासने; अशोक चव्हाण यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:41 IST

सरकारची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी सर्व राज्यांशी संपर्क ठेवतात.

ठळक मुद्देसत्तेत येण्यासाठी केवळ पोकळ भाषणे केली गेली, खोटी आश्वासने दिली गेली. आम्ही केवळ निवडणुकीपुरता शब्द दिला होता, तो जुमला होता, असेही सांगण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

औरंगाबाद : ‘सात वर्षांत केवळ खोटी भाषणे.. खोटी आश्वासने... यापलीकडे काहीही घडलेले नाही’, असा हल्लाबोल रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते ऑनलाइन पत्रपरिषदेत बोलत होते. इव्हेंट मॅनेजमेंट करून इतिहास घडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.त्यांनी सांगितले की, या सरकारचे अभिनंदन करणे तर दूरच; पण सत्तेतील मंत्र्यांनाही एकमेकांना शुभेच्छा देता येतील, अशी परिस्थिती नाही. सत्तेत येण्यासाठी केवळ पोकळ भाषणे केली गेली, खोटी आश्वासने दिली गेली. आम्ही केवळ निवडणुकीपुरता शब्द दिला होता, तो जुमला होता, असेही सांगण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

राहुल गांधी यांनी चुका दाखवल्या; पण...कोरोना महामारीचा मुकाबला करतानाही सरकारने कमालीचे दुर्लक्ष केले. राहुल गांधी यांनी चुका दाखवून दिल्या; पण त्याकडे दुर्लक्ष केले. सरकारला यातले गांभीर्य कळले नाही. जागतिक पातळीवर कोरोना दुर्लक्षाची दखल घेतली गेली. तरीही काही केले नाही, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

राइट मॅन इन द रॉंग पार्टी...चव्हाण म्हणाले, सरकारची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी सर्व राज्यांशी संपर्क ठेवतात. महाराष्ट्रासाठी त्यांची तळमळ आहे; पण गडकरी म्हणजे राइट मॅन इन द राँग पार्टी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना मूर्ख बनविण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उचलण्यासाठी आरक्षण कायदा केला. पण हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही.

मेटेंच्या टीकेला फारसं महत्त्व देत नाही...छत्रपती संभाजीराजेंनी सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते योग्य आहेत. बाळासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यातून आताच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. विनायक मेटे पुढची विधान परिषद आपल्याला मिळावी, यासाठी सातत्याने माध्यमांसमोर राहतात. राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर टीका केली तर काही फरक पडत नाही. हा भाजपचा अजेंडा आहे. मेटे यांच्या टीकेला मी फारसं महत्त्व देत नाही. असे चव्हाण यांनी नमूद केले.

विलासरावांच्या स्मारकासाठी मदत करणार...माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे औरंगाबादेत स्मारक व्हावे यासाठी समितीची स्थापना केली आहे. शिवाय औरंगाबादेतील शासकीय कर्करोग उपचार केंद्राला विलासरावांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे, याविषयी चव्हाण म्हणाले, की विलासरावांचे स्मारक झाले पाहिजे. कॅन्सर हॉस्पिटललाही विलासरावांचे नाव दिले पाहिजे. मी यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेन. संजय लाखे पाटील, विलास औताडे, डॉ.कल्याण काळे, हिशाम उस्मानी आदीही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी