शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:17 IST

४७ हजार कि.मी.चा प्रवास रद्द

ठळक मुद्दे२२४ बस निवडणुकीच्या कामात

औरंगाबाद : मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी सोमवारी तब्बल २२४ बसगाड्या पाठविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात सातशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या. याचा जिल्ह्यासह औरंगाबादहून विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून २० आणि २१ आॅक्टोबर रोजी २२४ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे २० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७२६ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर ४७ हजार १२८ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला. सोमवारीदेखील अशीच परिस्थिती राहिली. ठिकठिकाणाहून नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच गर्दी होती.

मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी २ वाजेपर्यंत जळगाव, सिल्लोड, धुळे यासह पिशोर, लाडसावंगी, भोकरदन, गणोरी, धामणगाव, म्हैसमाळ, बाबरा आदी ग्रामीण भागांतील ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकासह हर्सूल टी-पॉइंट येथे सिल्लोड, जळगाव आदी मार्गांवरील प्रवासी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळले होते.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बसगाड्या हर्सूल टी-पॉइंटवर थांबविण्यात येत नव्हत्या. त्यामुळे नाईलाजाने काळीपिवळी वाहनाने प्रवास करण्याची नामुष्की अनेकांवर ओढावली. पंचवटी चौकातही प्रवाशांना बसची नुसती प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. 

बसची व्यवस्था केली : विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, ‘एसटी’च्या रविवारी ७२७ फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारीही अशीच परिस्थिती होती. हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी बसची व्यवस्था केली होती. 

बसगाड्यांची परिस्थितीआगार    रद्द फेऱ्या    रद्द कि.मी.मध्यवर्ती बसस्थानक    ८०                 ६,९६७पैठण     ५४                ३,१५३सिल्लोड     १३८        ७,९८२वैजापूर     २२६        ११,७९५कन्नड      ९२        ६,४४३गंगापूर    १३६        ९,७८८एकूण    ७२६        ४७,१२८

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019