शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:17 IST

४७ हजार कि.मी.चा प्रवास रद्द

ठळक मुद्दे२२४ बस निवडणुकीच्या कामात

औरंगाबाद : मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी सोमवारी तब्बल २२४ बसगाड्या पाठविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात सातशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या. याचा जिल्ह्यासह औरंगाबादहून विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून २० आणि २१ आॅक्टोबर रोजी २२४ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे २० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७२६ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर ४७ हजार १२८ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला. सोमवारीदेखील अशीच परिस्थिती राहिली. ठिकठिकाणाहून नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच गर्दी होती.

मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी २ वाजेपर्यंत जळगाव, सिल्लोड, धुळे यासह पिशोर, लाडसावंगी, भोकरदन, गणोरी, धामणगाव, म्हैसमाळ, बाबरा आदी ग्रामीण भागांतील ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकासह हर्सूल टी-पॉइंट येथे सिल्लोड, जळगाव आदी मार्गांवरील प्रवासी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळले होते.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बसगाड्या हर्सूल टी-पॉइंटवर थांबविण्यात येत नव्हत्या. त्यामुळे नाईलाजाने काळीपिवळी वाहनाने प्रवास करण्याची नामुष्की अनेकांवर ओढावली. पंचवटी चौकातही प्रवाशांना बसची नुसती प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. 

बसची व्यवस्था केली : विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, ‘एसटी’च्या रविवारी ७२७ फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारीही अशीच परिस्थिती होती. हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी बसची व्यवस्था केली होती. 

बसगाड्यांची परिस्थितीआगार    रद्द फेऱ्या    रद्द कि.मी.मध्यवर्ती बसस्थानक    ८०                 ६,९६७पैठण     ५४                ३,१५३सिल्लोड     १३८        ७,९८२वैजापूर     २२६        ११,७९५कन्नड      ९२        ६,४४३गंगापूर    १३६        ९,७८८एकूण    ७२६        ४७,१२८

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019