शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:17 IST

४७ हजार कि.मी.चा प्रवास रद्द

ठळक मुद्दे२२४ बस निवडणुकीच्या कामात

औरंगाबाद : मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी सोमवारी तब्बल २२४ बसगाड्या पाठविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात सातशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या. याचा जिल्ह्यासह औरंगाबादहून विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून २० आणि २१ आॅक्टोबर रोजी २२४ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे २० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७२६ बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर ४७ हजार १२८ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला. सोमवारीदेखील अशीच परिस्थिती राहिली. ठिकठिकाणाहून नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच गर्दी होती.

मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी २ वाजेपर्यंत जळगाव, सिल्लोड, धुळे यासह पिशोर, लाडसावंगी, भोकरदन, गणोरी, धामणगाव, म्हैसमाळ, बाबरा आदी ग्रामीण भागांतील ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकासह हर्सूल टी-पॉइंट येथे सिल्लोड, जळगाव आदी मार्गांवरील प्रवासी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळले होते.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बसगाड्या हर्सूल टी-पॉइंटवर थांबविण्यात येत नव्हत्या. त्यामुळे नाईलाजाने काळीपिवळी वाहनाने प्रवास करण्याची नामुष्की अनेकांवर ओढावली. पंचवटी चौकातही प्रवाशांना बसची नुसती प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. 

बसची व्यवस्था केली : विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, ‘एसटी’च्या रविवारी ७२७ फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारीही अशीच परिस्थिती होती. हर्सूल टी-पॉइंटवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी बसची व्यवस्था केली होती. 

बसगाड्यांची परिस्थितीआगार    रद्द फेऱ्या    रद्द कि.मी.मध्यवर्ती बसस्थानक    ८०                 ६,९६७पैठण     ५४                ३,१५३सिल्लोड     १३८        ७,९८२वैजापूर     २२६        ११,७९५कन्नड      ९२        ६,४४३गंगापूर    १३६        ९,७८८एकूण    ७२६        ४७,१२८

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019