शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

By विकास राऊत | Updated: January 19, 2024 11:45 IST

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर होत असून २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ आत्महत्या झाल्या. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. परिणामी खरीप आणि रब्बी हंमागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीचे उत्पादन घटणे, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे २०२३ या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे बोलले जाते.

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. २०२३ मध्ये जानेवारी ते मे या काळातही अवकाळीमुळे पिकांचेही नुकसान झाले. शासन मदतीची घोषणा ऑनलाइनच्या कचाट्यात अडकली. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. २०२२ मधील सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. गेल्या मान्सूनमध्ये सुमारे दीड महिना पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले. मराठवाड्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. ही सगळी कारणे शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरली.

मागील चार वर्षांतील आकडे असेवर्ष.......शेतकरी आत्महत्या२०२०...... ७७३२०२१...... ८८७२०२२.......१०२२२०२३......१०८८

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्याजिल्हा............ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर.. १८२जालना.......७४परभणी....१०३हिंगोली....४२नांदेड.... १७५बीड...२६९लातूर...७२धाराशीव...१७१एकूण....१०८८

संवेदनाशून्यतेमुळे हे सगळे घडतेय...वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन सुरू आहे की बंद हे माहिती नाही. राजकीय नेते, प्रशासन संवेदनाशून्य झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या, उपाययोजनांकडे कुणी लक्ष देत नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले जात आहे. त्यांनी काय पिकवावे, कुठे विकावे, महागाईचा त्यांना काय फटका बसतोय, निसर्गाच्या प्रकोपातून ते कसे वाचतील यावर विचार करण्याची कुणाचीही इच्छा दिसत नाही.- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाfarmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्र