शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

By विकास राऊत | Updated: January 19, 2024 11:45 IST

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर होत असून २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ आत्महत्या झाल्या. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. परिणामी खरीप आणि रब्बी हंमागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीचे उत्पादन घटणे, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे २०२३ या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे बोलले जाते.

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. २०२३ मध्ये जानेवारी ते मे या काळातही अवकाळीमुळे पिकांचेही नुकसान झाले. शासन मदतीची घोषणा ऑनलाइनच्या कचाट्यात अडकली. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. २०२२ मधील सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. गेल्या मान्सूनमध्ये सुमारे दीड महिना पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले. मराठवाड्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. ही सगळी कारणे शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरली.

मागील चार वर्षांतील आकडे असेवर्ष.......शेतकरी आत्महत्या२०२०...... ७७३२०२१...... ८८७२०२२.......१०२२२०२३......१०८८

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्याजिल्हा............ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर.. १८२जालना.......७४परभणी....१०३हिंगोली....४२नांदेड.... १७५बीड...२६९लातूर...७२धाराशीव...१७१एकूण....१०८८

संवेदनाशून्यतेमुळे हे सगळे घडतेय...वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन सुरू आहे की बंद हे माहिती नाही. राजकीय नेते, प्रशासन संवेदनाशून्य झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या, उपाययोजनांकडे कुणी लक्ष देत नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले जात आहे. त्यांनी काय पिकवावे, कुठे विकावे, महागाईचा त्यांना काय फटका बसतोय, निसर्गाच्या प्रकोपातून ते कसे वाचतील यावर विचार करण्याची कुणाचीही इच्छा दिसत नाही.- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाfarmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्र