शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गजानन बारवाल यांना स्वगृही आणण्याचे सेनेचे प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:20 IST

शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले.

ठळक मुद्देपक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र केला महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते स्थायी समितीचे सभापतीही आहेत. त्यांना परत एकदा सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. १९ एप्रिल रोजी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारवाल यांना सेनेत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

सेनेत ठराविक नेत्यांचीच दादागिरी चालते. त्यामुळे पक्षातील अनेक मातब्बर नेते नाराज आहेत. काही नेत्यांना तर पक्षाने बाजूला केले आहे. ही मंडळी पक्ष सोडून दुसरीकडेही जाऊ शकत नाही. कारण त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आहे. पक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र करून पदमपुरा वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढविणे पसंत केले. त्यांना पराभूत करण्यासाठी सेनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, सेना नेत्यांना यश आले नाही. निवडून आल्यावर बारवाल यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

भाजपने त्यांना आपल्या वाट्याचे सभापतीपदही दिले. त्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात बारवाल यांना ‘समाधान’कारक असे काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एक वर्ष सभापतीपद वाढवून मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. पुढील सभापतीपद सेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे सेना बारवाल यांना संधी देण्याचा प्रश्नच नाही. उलट सेनेत राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ व इतर ज्येष्ठ नगरसेवक या पदावर दावा ठोकत आहेत.

भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न गजानन बारवाल सेनेत असताना त्यांना सभापती, महापौरपद देण्यात आले होते. एकदा विधानसभेचे तिकीटही सेनेनेच दिले होते. भविष्यात भाजपमध्ये खूप काही मिळणार नाही, त्यामुळे स्वगृही परत या, असा आग्रह सेनेच्या काही नेत्यांनी बारवाल यांच्यासमोर धरला आहे. बारवाल यांनी सेनेत परत येण्यासाठी इच्छाही व्यक्त केलेली नाही. येणारे सभापतीपद देण्याचे आश्वासन बारवाल यांना सेनेकडून देण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मी भाजपमध्ये सुखी आहे...गजानन बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. सध्या भाजपमध्ये मी खुश आहे. सेनेत परत जाण्याचा विचारही नाही. भाजपनेही मला खूप काही भरभरून दिले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा