शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

गजानन बारवाल यांना स्वगृही आणण्याचे सेनेचे प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:20 IST

शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले.

ठळक मुद्देपक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र केला महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते स्थायी समितीचे सभापतीही आहेत. त्यांना परत एकदा सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. १९ एप्रिल रोजी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारवाल यांना सेनेत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

सेनेत ठराविक नेत्यांचीच दादागिरी चालते. त्यामुळे पक्षातील अनेक मातब्बर नेते नाराज आहेत. काही नेत्यांना तर पक्षाने बाजूला केले आहे. ही मंडळी पक्ष सोडून दुसरीकडेही जाऊ शकत नाही. कारण त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आहे. पक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र करून पदमपुरा वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढविणे पसंत केले. त्यांना पराभूत करण्यासाठी सेनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, सेना नेत्यांना यश आले नाही. निवडून आल्यावर बारवाल यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.

भाजपने त्यांना आपल्या वाट्याचे सभापतीपदही दिले. त्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात बारवाल यांना ‘समाधान’कारक असे काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एक वर्ष सभापतीपद वाढवून मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. पुढील सभापतीपद सेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे सेना बारवाल यांना संधी देण्याचा प्रश्नच नाही. उलट सेनेत राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ व इतर ज्येष्ठ नगरसेवक या पदावर दावा ठोकत आहेत.

भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न गजानन बारवाल सेनेत असताना त्यांना सभापती, महापौरपद देण्यात आले होते. एकदा विधानसभेचे तिकीटही सेनेनेच दिले होते. भविष्यात भाजपमध्ये खूप काही मिळणार नाही, त्यामुळे स्वगृही परत या, असा आग्रह सेनेच्या काही नेत्यांनी बारवाल यांच्यासमोर धरला आहे. बारवाल यांनी सेनेत परत येण्यासाठी इच्छाही व्यक्त केलेली नाही. येणारे सभापतीपद देण्याचे आश्वासन बारवाल यांना सेनेकडून देण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मी भाजपमध्ये सुखी आहे...गजानन बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. सध्या भाजपमध्ये मी खुश आहे. सेनेत परत जाण्याचा विचारही नाही. भाजपनेही मला खूप काही भरभरून दिले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा