शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हंगामी कामगारांनाही अपघातानंतर मिळतो विमा; अकरा महिन्यांत ५० प्रकरणात २५ लाख प्रदान

By साहेबराव हिवराळे | Updated: January 4, 2024 19:12 IST

कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना अपघात विमा दिला जातो. या ११ महिन्यांत कामगारांनी क्लेम टाकले असून, त्यापैकी कामावर जखमी होऊन तो मृत्यू पावलेला असल्यास त्याला विम्याचा लाभ देण्यात येतो. गतवर्षी किमान ५०च्या जवळपास कामगारांना २५ लाखाच्या जवळपास विम्याचा लाभ झाला आहे. बहुतांश फायली अद्यापही पेंडिंग आहेत, त्यावर काही विचार देखील झालेला नाही, कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहे योजना?अपघात विमा ही योजना कामगारांचा कामाच्या दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्यास तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. त्याच्या कुटुंबीयाला तो विम्याचा लाभ घेता येतो. जखमी असल्यास त्यास उपचारासाठी देखील निधी उपलब्ध केला जातो. हंगाम कामगार नोंदणी केली की त्याचा विमाही उतरविला जातो.

नोंदणी कशी करणार?दरवर्षी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे असून, ती नोंदणी केल्यावर सरकारने ठरवून दिलेल्या योजनेत तुम्हाला लाभ घेता येतो. अपघात तसेच इतर गंभीर आजारी असल्यास तुम्हाला त्यावेळी दवाखान्यात उपचार देखील घेणे सोयीचे होते. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष ही कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करणे शक्य आहे.

निकष काय?या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त १/- रुपये भरून २ लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल. कामगार कोणत्या ठेकेदाराकडे काम करतो, त्याची नोंदणी अपडेट असावी, एकाच ठिकाणी विम्याचा लाभ घेता येईल त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे.

किती विमा मिळतो?दोन लाखाचा विमा असून, त्यात कामगारांचा विमा उतरविला जातो. इतरही त्याला किरकोळ लाभ दिले जातात, त्याचा क्लेम तुम्हाला रीतसरपणे कार्यालयाकडे दाखल करावे लागतात.

जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असावाआर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.

विमा योजनेचा लाभया सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.- कामगार आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक