शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हंगामी कामगारांनाही अपघातानंतर मिळतो विमा; अकरा महिन्यांत ५० प्रकरणात २५ लाख प्रदान

By साहेबराव हिवराळे | Updated: January 4, 2024 19:12 IST

कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना अपघात विमा दिला जातो. या ११ महिन्यांत कामगारांनी क्लेम टाकले असून, त्यापैकी कामावर जखमी होऊन तो मृत्यू पावलेला असल्यास त्याला विम्याचा लाभ देण्यात येतो. गतवर्षी किमान ५०च्या जवळपास कामगारांना २५ लाखाच्या जवळपास विम्याचा लाभ झाला आहे. बहुतांश फायली अद्यापही पेंडिंग आहेत, त्यावर काही विचार देखील झालेला नाही, कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहे योजना?अपघात विमा ही योजना कामगारांचा कामाच्या दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्यास तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. त्याच्या कुटुंबीयाला तो विम्याचा लाभ घेता येतो. जखमी असल्यास त्यास उपचारासाठी देखील निधी उपलब्ध केला जातो. हंगाम कामगार नोंदणी केली की त्याचा विमाही उतरविला जातो.

नोंदणी कशी करणार?दरवर्षी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे असून, ती नोंदणी केल्यावर सरकारने ठरवून दिलेल्या योजनेत तुम्हाला लाभ घेता येतो. अपघात तसेच इतर गंभीर आजारी असल्यास तुम्हाला त्यावेळी दवाखान्यात उपचार देखील घेणे सोयीचे होते. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष ही कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करणे शक्य आहे.

निकष काय?या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त १/- रुपये भरून २ लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल. कामगार कोणत्या ठेकेदाराकडे काम करतो, त्याची नोंदणी अपडेट असावी, एकाच ठिकाणी विम्याचा लाभ घेता येईल त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे.

किती विमा मिळतो?दोन लाखाचा विमा असून, त्यात कामगारांचा विमा उतरविला जातो. इतरही त्याला किरकोळ लाभ दिले जातात, त्याचा क्लेम तुम्हाला रीतसरपणे कार्यालयाकडे दाखल करावे लागतात.

जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असावाआर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.

विमा योजनेचा लाभया सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.- कामगार आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक