शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 20:02 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. औरंगाबादमध्ये इतर सत्रात सुट्या कमी असल्याने, दिवाळीतील सुट्या अधिक असतात. २१ दिवसांच्या सुटीच्या विश्रांतीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळांनीही तयारी केली आहे. शाळा सोमवारी सुरू होत असल्याचे संदेश पालकांना मोबाइलवर पाठविण्याची सुविधाही काही शाळांनी केली आहे. अनेक शाळांत मुलांचे गुलाबपूष्प देऊन स्वागत करण्यात आले.

पूर्वसंध्येला शाळांनी वर्गांची साफसफाई केली. सुट्यानंतर नियमितपणे वर्ग भरणार असल्याने तशी तयारी आणि पहिल्या सत्रातील परीक्षांमधील गुण ही विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये कळविण्यात येतात. दिवाळी सुट्यात दिलेले होमवर्कही तपासण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य आणि स्थलांतर विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठभ शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी आढावा घेण्यात आला.

प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. स्थलांतर रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०० टक्के स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार असून, त्यासाठी बालरक्षक पथके राज्यभरात फिरत असल्याची माहिती जि.प.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाविद्यालयातील शैक्षणिक सत्रालाही सुरूवात झाली. तासिकांनाही सुरूवात करण्यात आली असून,यात काही ठिकाणी परीक्षांही सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद