शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 20:02 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. औरंगाबादमध्ये इतर सत्रात सुट्या कमी असल्याने, दिवाळीतील सुट्या अधिक असतात. २१ दिवसांच्या सुटीच्या विश्रांतीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळांनीही तयारी केली आहे. शाळा सोमवारी सुरू होत असल्याचे संदेश पालकांना मोबाइलवर पाठविण्याची सुविधाही काही शाळांनी केली आहे. अनेक शाळांत मुलांचे गुलाबपूष्प देऊन स्वागत करण्यात आले.

पूर्वसंध्येला शाळांनी वर्गांची साफसफाई केली. सुट्यानंतर नियमितपणे वर्ग भरणार असल्याने तशी तयारी आणि पहिल्या सत्रातील परीक्षांमधील गुण ही विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये कळविण्यात येतात. दिवाळी सुट्यात दिलेले होमवर्कही तपासण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य आणि स्थलांतर विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठभ शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी आढावा घेण्यात आला.

प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. स्थलांतर रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०० टक्के स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार असून, त्यासाठी बालरक्षक पथके राज्यभरात फिरत असल्याची माहिती जि.प.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाविद्यालयातील शैक्षणिक सत्रालाही सुरूवात झाली. तासिकांनाही सुरूवात करण्यात आली असून,यात काही ठिकाणी परीक्षांही सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद