शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 18:23 IST

corona virus जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशिक्षक कोरोनाग्रस्त होत असल्याने घेतला निर्णय५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वाय

औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी जारी केले आहेत.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. दहावी आणि बारावी इयत्तेचे वर्ग सोडून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला. शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेच आहे, शिवाय शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यास या संस्था चार दिवस बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वायकोरोनामुळे जरी ५ वी ते ९ आणि अकरावी पर्यंतचे वर्ग भरणार नसले तरी शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसे सगळेच शिक्षक उपस्थितीत असतात. जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी व इतर अभियान सुरू आहेत. त्या कामासाठी शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना कामावर यावे लागणार आहे, असे प्र.जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी असे२२१८ पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी आहेत. तर नववी ते बारावी २ लाख ६७ हजार ७१९ विद्यार्थी आहेत. यातील नववी आणि अकरावीचे वर्ग भरणार नाहीत. त्यांना आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय असणार आहे. ७ हजार ६२३ शिक्षक कार्यरत आहेत. दहावी इयत्तेमध्ये ६५ हजार ११ तर बारावीमध्ये ५५ हजार १७७ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू राहणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा