शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अपघात सानुग्रह अनुदानात मिळतात केवळ ७५ हजार रुपये; शालेय विद्यार्थ्यांचा जीव एवढा का कवडीमोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:25 IST

अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ठळक मुद्देमृत्यू पावल्यास कुटुंबाला दिली जाते अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदतजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत यासंबंधीच्या प्रस्तावांची पडताळणी करून लाभ दिला जातो.

- विजय सरवदेऔरंगाबाद : आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भविष्य आहे, असे मानले जाते; परंतु हे खरे आहे का. खरे असेल, तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेप्रती किती संवेदनशील आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्याचा जीव एवढा कवडीमोल आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण मिळावे, यासाठी सरकार विद्यार्थ्यांचा विमा उतरवीत होते. त्याचा हप्तादेखील सरकारतर्फे भरला जायचा. मात्र, विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत काही कंपन्यांकडून अनेकदा टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून या योजनेत बदल करण्यात आला आहे. सन २०१३ पासून ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या आईच्या बँक खात्यात ७५ हजार रुपये, विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व (दोन अवयव निकामी झाल्यास) आल्यास ५० हजार रुपये, अपघातात एक अवयव निकामी झालेला असेल, तर ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची या योजनेत तरतूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत यासंबंधीच्या प्रस्तावांची पडताळणी करून लाभ दिला जातो.

या समितीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपायुक्त, माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांचा समावेश आहे. या समितीची महिन्यातून एक वेळ तरी बैठक आयोजित करावी, अशी शासनाची सूचना आहे; पण याबाबत अधिकारी फारसे गंभीर दिसत नाहीत. या योजनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणारी आर्थिक मदत ही प्राधान्यक्रमानुसार आई आणि त्यानंतर वडील अथवा भाऊ, बहीण यांना देण्यात येईल. मात्र, अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी आर्थिक मदतीची या योजनेत तरतूद नाही.

या घटनांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नाही

- आत्महत्येचा प्रयत्न करणे.- आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे.- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.- अमली पदार्थ्यांच्या सेवनानंतर झालेला अपघात.- नैसर्गिक मृत्यू.

- मोटार शर्यतीत झालेला अपघात.

उपचारासाठी तरतूदच नाहीयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात मयत विद्यार्थी, तसेच एक किंवा दोन अवयव निकामी झाले असतील, तर आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. अपघातात जखमी विद्यार्थ्यावर उपचारासाठी मात्र या योजनेत तरतूद नाही. जिल्ह्यात सन २०१४ पासून आतापर्यंत २८५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.मागील दोन-तीन वर्षांत तरतुदीअभावी लाभ देण्यात आलेला नव्हता.शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर मी जवळपास ५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा