शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

अपघात सानुग्रह अनुदानात मिळतात केवळ ७५ हजार रुपये; शालेय विद्यार्थ्यांचा जीव एवढा का कवडीमोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:25 IST

अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ठळक मुद्देमृत्यू पावल्यास कुटुंबाला दिली जाते अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदतजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत यासंबंधीच्या प्रस्तावांची पडताळणी करून लाभ दिला जातो.

- विजय सरवदेऔरंगाबाद : आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भविष्य आहे, असे मानले जाते; परंतु हे खरे आहे का. खरे असेल, तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेप्रती किती संवेदनशील आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्याचा जीव एवढा कवडीमोल आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण मिळावे, यासाठी सरकार विद्यार्थ्यांचा विमा उतरवीत होते. त्याचा हप्तादेखील सरकारतर्फे भरला जायचा. मात्र, विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत काही कंपन्यांकडून अनेकदा टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून या योजनेत बदल करण्यात आला आहे. सन २०१३ पासून ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या आईच्या बँक खात्यात ७५ हजार रुपये, विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व (दोन अवयव निकामी झाल्यास) आल्यास ५० हजार रुपये, अपघातात एक अवयव निकामी झालेला असेल, तर ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची या योजनेत तरतूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत यासंबंधीच्या प्रस्तावांची पडताळणी करून लाभ दिला जातो.

या समितीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपायुक्त, माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांचा समावेश आहे. या समितीची महिन्यातून एक वेळ तरी बैठक आयोजित करावी, अशी शासनाची सूचना आहे; पण याबाबत अधिकारी फारसे गंभीर दिसत नाहीत. या योजनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणारी आर्थिक मदत ही प्राधान्यक्रमानुसार आई आणि त्यानंतर वडील अथवा भाऊ, बहीण यांना देण्यात येईल. मात्र, अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी आर्थिक मदतीची या योजनेत तरतूद नाही.

या घटनांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नाही

- आत्महत्येचा प्रयत्न करणे.- आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे.- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.- अमली पदार्थ्यांच्या सेवनानंतर झालेला अपघात.- नैसर्गिक मृत्यू.

- मोटार शर्यतीत झालेला अपघात.

उपचारासाठी तरतूदच नाहीयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात मयत विद्यार्थी, तसेच एक किंवा दोन अवयव निकामी झाले असतील, तर आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. अपघातात जखमी विद्यार्थ्यावर उपचारासाठी मात्र या योजनेत तरतूद नाही. जिल्ह्यात सन २०१४ पासून आतापर्यंत २८५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.मागील दोन-तीन वर्षांत तरतुदीअभावी लाभ देण्यात आलेला नव्हता.शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर मी जवळपास ५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा