शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शाळेची घंटा वाजली; पण जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

-- शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, ...

--

शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरायला सुरुवात झाली. उपस्थितीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शासनाकडून थोड्या सबुरीने पावले टाकण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. पुढील पंधरा दिवस काय परिणाम होतात ते पाहून पुढची पावले टाकण्यात येणार असल्याने सध्या ना उपस्थितीचा आढावा, ना शाळा सुरू असल्याच्या स्थितीबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजली खरी; पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण, असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

बहुतांशी इतर जिल्ह्यांत अद्याप पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या खऱ्या; मात्र प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला सध्या पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाहीत. त्यात कोरोनाचे सावट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षण विभागाचे काम सध्या ‘आस्तेकदम’ सुरू आहे. आठवी ते बारावीच्या उपस्थितीसंदर्भात १०० टक्के उपस्थितीचा शासन आदेश निघाला आहे. मात्र, प्राथमिक शाळांत विद्यार्थी संख्या वाढत असली, तरी शिक्षक मात्र जुन्या शासन आदेशावरच बोट ठेवून ५० टक्के उपस्थितीनेच शाळेत हजेरी लावत आहेत.

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली - ७७,०६८

दुसरी - ८७,९६२

तिसरी - ८८,५१४

चौथी - ८८,७३८

पाचवी - ८९,९५२

सहावी - ८७,६२५

सातवी - ८६,६७६

आठवी - ८०,४१८

नववी - ७६,२७२

दहावी - ७४,३१४

---

जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू

---

ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले. जिल्ह्यातील एकूण १२८ केंद्रांमध्ये आठवी ते बारावीच्या एकूण ९०७ शाळा आहेत. यामध्ये आठवी ते बारावीची एकूण विद्यार्थी संख्या १ लाख २२ हजार ३४९ आहे. त्यापैकी ६३६ पेक्षा अधिक शाळा सुरू आहेत. त्यात दिवसेंदिवस उपस्थिती वाढत असून, ५० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात शिकण्यासाठी येत आहेत.

---

पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू

---

जिल्ह्यात पाचवी ते सातवीचे वर्ग ६ सप्टेंबरपासून सुरू झाले. सुमारे दोन हजार शाळांतील वर्ग भरायला सुरुवात झाली. मात्र, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळा उघडण्यासंदर्भात कोणताही अहवाल शिक्षण विभागाकडून सध्या मागविण्यात येत नाही. रिस्क घेऊन सुरू केलेल्या शाळांत विद्यार्थी सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते.

---

शाळांकडून अद्याप उपस्थिती किंवा कोणत्या शाळा सुरू झाल्या याबद्दल माहिती मागवली नाही. मात्र, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, ५० टक्केपेक्षा अधिक उपस्थिती आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थी सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात आहे.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.), औरंगाबाद