शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

शाळेची घंटा वाजली; पण जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

-- शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, ...

--

शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरायला सुरुवात झाली. उपस्थितीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शासनाकडून थोड्या सबुरीने पावले टाकण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. पुढील पंधरा दिवस काय परिणाम होतात ते पाहून पुढची पावले टाकण्यात येणार असल्याने सध्या ना उपस्थितीचा आढावा, ना शाळा सुरू असल्याच्या स्थितीबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजली खरी; पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण, असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

बहुतांशी इतर जिल्ह्यांत अद्याप पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या खऱ्या; मात्र प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला सध्या पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाहीत. त्यात कोरोनाचे सावट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षण विभागाचे काम सध्या ‘आस्तेकदम’ सुरू आहे. आठवी ते बारावीच्या उपस्थितीसंदर्भात १०० टक्के उपस्थितीचा शासन आदेश निघाला आहे. मात्र, प्राथमिक शाळांत विद्यार्थी संख्या वाढत असली, तरी शिक्षक मात्र जुन्या शासन आदेशावरच बोट ठेवून ५० टक्के उपस्थितीनेच शाळेत हजेरी लावत आहेत.

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली - ७७,०६८

दुसरी - ८७,९६२

तिसरी - ८८,५१४

चौथी - ८८,७३८

पाचवी - ८९,९५२

सहावी - ८७,६२५

सातवी - ८६,६७६

आठवी - ८०,४१८

नववी - ७६,२७२

दहावी - ७४,३१४

---

जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू

---

ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले. जिल्ह्यातील एकूण १२८ केंद्रांमध्ये आठवी ते बारावीच्या एकूण ९०७ शाळा आहेत. यामध्ये आठवी ते बारावीची एकूण विद्यार्थी संख्या १ लाख २२ हजार ३४९ आहे. त्यापैकी ६३६ पेक्षा अधिक शाळा सुरू आहेत. त्यात दिवसेंदिवस उपस्थिती वाढत असून, ५० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात शिकण्यासाठी येत आहेत.

---

पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू

---

जिल्ह्यात पाचवी ते सातवीचे वर्ग ६ सप्टेंबरपासून सुरू झाले. सुमारे दोन हजार शाळांतील वर्ग भरायला सुरुवात झाली. मात्र, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळा उघडण्यासंदर्भात कोणताही अहवाल शिक्षण विभागाकडून सध्या मागविण्यात येत नाही. रिस्क घेऊन सुरू केलेल्या शाळांत विद्यार्थी सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते.

---

शाळांकडून अद्याप उपस्थिती किंवा कोणत्या शाळा सुरू झाल्या याबद्दल माहिती मागवली नाही. मात्र, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, ५० टक्केपेक्षा अधिक उपस्थिती आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थी सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात आहे.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.), औरंगाबाद