शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यत शिष्यवृत्ती; कागदपत्रे काय लागतात?

By राम शिनगारे | Updated: November 24, 2023 20:04 IST

शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

छत्रपती संभाजीनगर : शाळेतून मुलींची गळती कमी व्हावी, दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ६०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

एससींना ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजारराज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विद्यार्थ्यांना १५०० हजार रुपये मिळतात. त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

निकष काय?शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

कागदपत्रे काय लागतात?राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक असतात. ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांमधील शिक्षकाचीही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्याठिकाणी तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

योजनेचा लाभ घ्यावासर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नावे किंवा प्रस्ताव सादर करावीत. तसेच, जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.- ओमप्रकाश रामावत, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण