शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

बीड, लातूरमध्ये सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत घोटाळा- संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 3:45 PM

बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद- बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रेशनची धान्य वाहतूक करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने प्रशासनाला दिलेल्या चारचाकी वाहनांच्या यादीत काही दुचाकींचे नंबर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे दोन्ही जिल्ह्याचा एकच ठेकेदार असून ठेकेदाराने  बीड आणि लातुर जिल्ह्या प्रशासनाला एक समान वाहनांची यादी दिल्याने एक वाहने दोन जिल्ह्यात कशी अन्न-धान्याची वाहतुक कशी करू शकतात,असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला.याविषयी डॉ. भानुसे म्हणाले की, आम्ही राज्यभरातील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा निर्णय घेतला. यांतर्गत राज्यातील सर्वच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधात माहिती कायद्यांतर्गत माहिती मागविली आहे. बीड आणि लातुर जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या दोन्ही जिल्ह्यातील रेशनच्या धान्याचा वाहतूक करणारा एकच ठेकेदार असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा ठेका घेताना ठेकेदाराने प्रशासनाला सादर केलेल्या त्याच्याकडील चारचाकी मालवाहु वाहनांशी शहानिशा न करता त्यास कंत्राट देण्यात आले. त्याने दिलेल्या वाहनांच्या यादीतील  एमएच-१६ एएस ८६७४, एमएच-१६ एएस ७२६४ या क्रमांकाच्या दुचाकी असल्याचे समोर आले. शिवाय दोन्ही जिल्ह्यात एकाचवेळी एमएच-२९एम ३५५५, एमएच-२३-७१३७, एमएच-१२डीटी ९४८१, एमएच१२एचडी २९५७, एमएच-२६एडी ०६०२, एमएच-३८डी ९३३३, एमएच-१३एक्स २४६८ ही वाहने कार्यरत असल्याचे दिसतात. हे सर्व संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांच्या संगनमताने सुरू असल्याचे त्यांनी सांगतले. बीड आणि लातुर जिल्ह्यातील ६०टक्के लोक उसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतरीत झालेले आहेत, असे असताना त्यांच्या नावे येणारे धान्य परस्पर ठेकेदार व अधिकारी संगनमताने काळ्याबाजारात विक्री करीत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी  जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे,अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांना दिल्याचे डॉ.भानुसे यांनी सांगितले.  यापत्रकार परिषदेलारमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, राजेंद्र पाटील, मोहिनी भानुसे आदी उपस्थित होते.