शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 14:23 IST

oxygen supply in Aurangabad रुग्णालयातील टेक्निशियन लक्ष ठेवत असल्याचा दावा

ठळक मुद्देही चूक बेतू शकते रुग्णांच्या जिवावर

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : काेरोनाच्या विळख्याने हजारो रुग्णांचा श्वास ऑक्सिजनवर सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये मोठमोठे लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन संपला की या टँकमध्ये पुन्हा लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. हे लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्याचे काम, जो ऑक्सिजन घेऊन येतो, तो टँकरचालकच करतो. त्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारांकडूनच चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. औरंगाबादेत कोरोनाचे सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल आहेत. सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे घाटीत गेल्या काही दिवसांत लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला. कोरोना रुग्ण वाढल्याने सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. परिणामी, घाटीत रोज ऑक्सिजन टँकर दाखल होत आहे. टँकरचालकच टँकमध्ये ऑक्सिजन भरण्याची प्रक्रिया पार पाडतो. त्यावर रुग्णालयातील टेक्निशियन रिफिलिंग कसे चालते, यावर देखरेख ठेवतो.

असे भरले जाते टँकमध्ये ऑक्सिजनटँकर आणि लिक्विड ऑक्सिजन टँक यांच्यात एक होस पाइप लावला जातो. त्यानंतर टँकरमधून टँकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. या टँकला एक टाॅप सिलिंग वाॅल असतो आणि दुसरा बाॅटम सिलिंग वाॅल असताे. टाॅप सिलिंगमधून ऑक्सिजन भरताना टँकचे प्रेशर कमी होते, तर बाॅटम सिलिंगमधून भरताना प्रेशर वाढते. त्यामुळे दोघांचा समतोल राखून ऑक्सिजन भरावा लागतो. टँकमध्ये ऑक्सिजन भरून झाल्यानंतर लिक्विड वेपराईजरपर्यंत पोहोचते. तेथून ऑक्सिजन गॅस तयार होतो. त्यानंतर रेग्युलेटरवर प्रेशर नियंत्रित करून ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचतो.

ही चूक बेतू शकते रुग्णांच्या जिवावरटँकच्या केवळ टाॅप सिलिंग वाॅलमधून ऑक्सिजन भरले तर प्रेशर कमी होऊन रुग्णांपर्यंत होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्याची भीती असते. टँकमध्ये प्रेशर असते. त्यामुळे व्हॉल्व्ह जर गतीने उघडला तर दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. टँकचे प्रेशर योग्य राखावे लागते. त्यात घट अथवा वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम रुग्णांपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनवर होतो.

चार ठिकाणची गळती केली बंदमेडिसीन विभागातील ऑक्सिजन पुरवठ्यातील चार ठिकाणची गळती काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. नाशिकच्या घटनेमुळे गळतीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आवश्यक ती खबरदारीनाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटीतील ऑक्सिजन टँकची पाहणी करण्यात आली. सध्यातरी कोणतीही अडचण नाही. आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गळती शोधण्याचे काम गेल्या काही दिवसांत काम करण्यात आले. रुग्णालयात ऑक्सिजन समितीही आहे. काही प्रश्न उद्भवला तर तत्काळ योग्य नियोजन केले जाते.- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

जबाबदारी ही टँकरचालकांचीऑक्सिज टँकमध्ये भरण्याची जबाबदारी ही टँकरचालकांची आहे. त्यासाठी टँकरचे चालक हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे रिफिलिंग तेच करू शकतात. प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीने ते करणे योग्य नाही. आमच्याकडे २ टेक्निशियन आहेत. ते कधीही उपलब्ध असतात. रिफिलिंग कसे चालते, यावर ते लक्ष ठेवतात.-डाॅ. अमोल जोशी, प्राणवायू समिती कार्यकारी प्रमुख, घाटी

घाटीतील स्थितीएकूण ऑक्सिजन टँक-७टँकची एकूण क्षमता - ३३ टनरोजची मागणी- १६ ते १८ टनदाखल रुग्ण-६२२

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी