शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

समाधानकारक : कोरोना रूग्णांचा मृत्यूदर अवघा १.२२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 14:11 IST

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी  झाले असून शहरात जुन् महिन्यात  ५. ९४  टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर  महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे.  महापालिका प्रशासक आस्तिककुमार  पाण्डेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊननंतर नागरिकांची रेलचेल वाढली. महापालिकेने संशयित रूग्ण शोधणे, त्यांची त्वरित तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह रूग्णावर  ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी  झाले असून शहरात जुन् महिन्यात  ५. ९४  टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर  महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे.  महापालिका प्रशासक आस्तिककुमार  पाण्डेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाऊननंतर नागरिकांची रेलचेल वाढली. महापालिकेने संशयित रूग्ण शोधणे, त्यांची त्वरित तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह रूग्णावर  युद्धपातळीवर योग्य औषधोपचार करणे, या तीन महत्त्वाच्या बाबींवर सर्वाधिक भर देण्यात आला. आतापर्यंत शहरात तब्बल २ लाख ६० हजार नागरिकांची तपासणी  करण्यात आली आहे. व्यापारी, बाहेरून येणारे प्रवासी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यापक प्रमाणात अत्याधुनिक ॲन्टिजन पद्धतीने तपासणी करण्यात आली. 

रूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. एकीकडे पॉझिटिव्ह रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, तर  दुसरीकडे  एमएचएमएच ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, पॉझिटिव्ह होऊन घरी गेलेले नागरिक  यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांना योग्यवेळी वैद्यकीय सहाय्य देण्याचे काम महापालिकेने केले. 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात मृत्यूदर कमी करणे, हा मुख्य उद्देश आहे. औरंगाबाद शहरात यापूर्वी पाच वेळेस सर्वेक्षण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ४०० पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दररोज ७०० ते ८०० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत औरंगाबाद शहरात सर्वात कमी रूग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा