शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मागील वर्षीच्या वह्यांवर मानावे लागेल समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या ...

औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या खरेदी करत असे, तेथे मागील शैक्षणिक वर्षात केवळ ३ ते ४ वह्यांवर काम भागविण्यात आले. यंदाही हीच परिस्थिती राहणार असल्याने स्टेशनरी विक्रेत्यांनी नवीन वह्या मागविण्याचे धाडस केले नाही.

कोरोनामुळे देशाचे सर्वात जास्त शैक्षणिक झाले आहे. आरोग्यानंतर शिक्षणाचा नंबर लागतो. मागील वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे वाया गेले. यंदा जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार होती; पण आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत सरकारने केले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. त्यामुळे जून महिन्यात शाळा सुरू होतील की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून काही सूचना आल्या नसल्याने ‘थांबा व वाट पहा,’ असे धोरण शाळा व्यवस्थापनाने अवलंबले आहे. शाळा सुरू होतील की नाही यासंदर्भात अनिश्चतता आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू होईल; पण मागील वर्षी जिल्ह्यात २७ कोटींपैकी केवळ ५ कोटींच्या वह्या विकल्या गेल्या होत्या. सुमारे २२ कोटी रुपयांच्या वह्या शिल्लक आहेत. वह्यांचे वितरक अविनाश फरसुले यांनी सांगितले की, जिल्ह्यात ९ लाख विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी १ डझन वह्या खरेदी करत असे, आता ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांनी दोन ते तीन वह्या खरेदी केल्या होत्या. एकच वही रफ म्हणून सर्व विषयासाठी वापरली जात होती. कारण, बहुतांश शाळांनी वह्या तपासल्या नाहीत. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत; पण अजूनही वह्यांची यादी शाळांनी पाठवली नाही. यामुळे वितरकांनी मुंबई, अहमदाबाद येथील उत्पादकांना नवीन ऑर्डर दिल्या नाहीत. बहुतांश वितरक मागील वर्षीच्या शिल्लक वह्या विक्री करून अडकलेली मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

चौकट

एकमेकांना दिली जुनी पुस्तके

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. पालकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले व आपल्या पाल्याची मागील वर्षीची पुस्तके दुसऱ्या पाल्यांना दिली. ३० ते ४० टक्के पालकांनी एकमेकांना पुस्तकांची अदलाबदल केली. तसेच पुस्तकाचे ऑनलाइन पीडीएफ उपलब्ध झाल्याने मागील वर्षी पुस्तकाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला, असे वितरकांनी नमूद केले.

चौकट

स्टेशनरीची १०० लहान दुकाने बंद

स्टेशनरी वितरकांनी सांगितले की, जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे ३ हजार स्टेशनरी दुकानदार आहेत. त्यातील शहरात ८०० च्या जवळपास दुकाने आहेत. जी दुकाने भाड्याने होती, अशा १०० हून अधिक दुकानदारांनी दुकाने खाली केली आहेत. कारण स्टेशनरी दुकानदारांचा मुख्य हंगाम मे ते जुलै हे तीन महिनेच असतो.