शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

मागील वर्षीच्या वह्यांवर मानावे लागेल समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या ...

औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या खरेदी करत असे, तेथे मागील शैक्षणिक वर्षात केवळ ३ ते ४ वह्यांवर काम भागविण्यात आले. यंदाही हीच परिस्थिती राहणार असल्याने स्टेशनरी विक्रेत्यांनी नवीन वह्या मागविण्याचे धाडस केले नाही.

कोरोनामुळे देशाचे सर्वात जास्त शैक्षणिक झाले आहे. आरोग्यानंतर शिक्षणाचा नंबर लागतो. मागील वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे वाया गेले. यंदा जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार होती; पण आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत सरकारने केले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. त्यामुळे जून महिन्यात शाळा सुरू होतील की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून काही सूचना आल्या नसल्याने ‘थांबा व वाट पहा,’ असे धोरण शाळा व्यवस्थापनाने अवलंबले आहे. शाळा सुरू होतील की नाही यासंदर्भात अनिश्चतता आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू होईल; पण मागील वर्षी जिल्ह्यात २७ कोटींपैकी केवळ ५ कोटींच्या वह्या विकल्या गेल्या होत्या. सुमारे २२ कोटी रुपयांच्या वह्या शिल्लक आहेत. वह्यांचे वितरक अविनाश फरसुले यांनी सांगितले की, जिल्ह्यात ९ लाख विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी १ डझन वह्या खरेदी करत असे, आता ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांनी दोन ते तीन वह्या खरेदी केल्या होत्या. एकच वही रफ म्हणून सर्व विषयासाठी वापरली जात होती. कारण, बहुतांश शाळांनी वह्या तपासल्या नाहीत. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत; पण अजूनही वह्यांची यादी शाळांनी पाठवली नाही. यामुळे वितरकांनी मुंबई, अहमदाबाद येथील उत्पादकांना नवीन ऑर्डर दिल्या नाहीत. बहुतांश वितरक मागील वर्षीच्या शिल्लक वह्या विक्री करून अडकलेली मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

चौकट

एकमेकांना दिली जुनी पुस्तके

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. पालकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले व आपल्या पाल्याची मागील वर्षीची पुस्तके दुसऱ्या पाल्यांना दिली. ३० ते ४० टक्के पालकांनी एकमेकांना पुस्तकांची अदलाबदल केली. तसेच पुस्तकाचे ऑनलाइन पीडीएफ उपलब्ध झाल्याने मागील वर्षी पुस्तकाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला, असे वितरकांनी नमूद केले.

चौकट

स्टेशनरीची १०० लहान दुकाने बंद

स्टेशनरी वितरकांनी सांगितले की, जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे ३ हजार स्टेशनरी दुकानदार आहेत. त्यातील शहरात ८०० च्या जवळपास दुकाने आहेत. जी दुकाने भाड्याने होती, अशा १०० हून अधिक दुकानदारांनी दुकाने खाली केली आहेत. कारण स्टेशनरी दुकानदारांचा मुख्य हंगाम मे ते जुलै हे तीन महिनेच असतो.