शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

सातारा-देवळाईत दूध, साखरेसह सकाळी घ्यावा लागतो पाण्याचा जार ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:48 IST

सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे मौन : जार व टँकर खरेदीचा दरमहिन्याला सहन करावा लागतो भार

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.स्थानिक जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व पाणीपुरवठा विभागाच्या टीमने गांधेली तलाव तसेच परदडी धरणावरून पाणी लिफ्टिंग करून आणण्यासाठी पाहणीदेखील केली होती; परंतु त्या योजनेला पुढे अचानक विराम आला. नगर परिषदेच्या दरम्यान मनपाच्या जलवाहिनीवरून नक्षत्रवाडी पॉइंटवरून मोफत टँकरने देवळाई-साताºयातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. सातारा देवळाईत सार्वजनिक विहिरीवर दर दोन दिवसाआड २४ हजार लिटरचे मोफत पाणी टाकण्यात येत आहे, इतर नागरिकांना १८ ड्रमच्या हिशेबाने पाच हजार लिटरचे टँकर खरेदी करावे लागत आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. गल्लीबोळात छोटे टँकर पाठविण्याच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून रांगेत थांबून पाण्याची कॅन, हंडे वाहून आणावेच लागतात.२४ हजार ७०० मालमत्ताधारकांना कर वसुलीसाठी मनपाने नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असून, अर्ध्याच्यावर नोटिसा पोहोचल्या आहेत. नागरिक कर भरण्यास स्वत:हून तयार आहेत; परंतु सेवासुविधांचे काय असाच सवाल नागरिकांसमोर कायम आहे.कागदी घोडे सुरूचसातारा, देवळाई मुख्य बायपासवरून एमआयडीसीची जलवाहिनी गेली असून, लगतच्या काही कॉलन्यात पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला यश आले होते. मनपा म्हणते नाहरकत प्रमाणपत्र एमआयडीसीला सादर केले, तर एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात अद्याप त्यास मंजुरी आली नाही. नागरिकांनी आंदोलनातून शंभरीच गाठली; परंतु पाणी देण्याऐवजी तोंडाला सतत पाने पुसली जात आहेत. - प्रा. प्रशांत अवचरमलपाण्यासाठी रस्त्यावर उतरणारमनपाकडून सातारा, देवळाई दोन्ही वसाहतीला मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. चाकोरीत चालणाºया शासकीय, निमशासकीय,अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरत नाही, याचा गैरफायदा मनपा घेत आहे. परिणामी कुटुंबाचे आर्थिक बजेट बिघडत आहे.-सामाजिक कार्यकर्त्या पंकजा माने

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी