शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
2
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
3
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
4
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
5
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
6
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
7
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
8
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
9
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
10
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
11
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
12
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
13
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
14
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
15
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
16
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
17
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
18
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
19
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
20
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईत दूध, साखरेसह सकाळी घ्यावा लागतो पाण्याचा जार ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:48 IST

सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे मौन : जार व टँकर खरेदीचा दरमहिन्याला सहन करावा लागतो भार

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.स्थानिक जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व पाणीपुरवठा विभागाच्या टीमने गांधेली तलाव तसेच परदडी धरणावरून पाणी लिफ्टिंग करून आणण्यासाठी पाहणीदेखील केली होती; परंतु त्या योजनेला पुढे अचानक विराम आला. नगर परिषदेच्या दरम्यान मनपाच्या जलवाहिनीवरून नक्षत्रवाडी पॉइंटवरून मोफत टँकरने देवळाई-साताºयातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. सातारा देवळाईत सार्वजनिक विहिरीवर दर दोन दिवसाआड २४ हजार लिटरचे मोफत पाणी टाकण्यात येत आहे, इतर नागरिकांना १८ ड्रमच्या हिशेबाने पाच हजार लिटरचे टँकर खरेदी करावे लागत आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. गल्लीबोळात छोटे टँकर पाठविण्याच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून रांगेत थांबून पाण्याची कॅन, हंडे वाहून आणावेच लागतात.२४ हजार ७०० मालमत्ताधारकांना कर वसुलीसाठी मनपाने नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असून, अर्ध्याच्यावर नोटिसा पोहोचल्या आहेत. नागरिक कर भरण्यास स्वत:हून तयार आहेत; परंतु सेवासुविधांचे काय असाच सवाल नागरिकांसमोर कायम आहे.कागदी घोडे सुरूचसातारा, देवळाई मुख्य बायपासवरून एमआयडीसीची जलवाहिनी गेली असून, लगतच्या काही कॉलन्यात पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला यश आले होते. मनपा म्हणते नाहरकत प्रमाणपत्र एमआयडीसीला सादर केले, तर एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात अद्याप त्यास मंजुरी आली नाही. नागरिकांनी आंदोलनातून शंभरीच गाठली; परंतु पाणी देण्याऐवजी तोंडाला सतत पाने पुसली जात आहेत. - प्रा. प्रशांत अवचरमलपाण्यासाठी रस्त्यावर उतरणारमनपाकडून सातारा, देवळाई दोन्ही वसाहतीला मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. चाकोरीत चालणाºया शासकीय, निमशासकीय,अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरत नाही, याचा गैरफायदा मनपा घेत आहे. परिणामी कुटुंबाचे आर्थिक बजेट बिघडत आहे.-सामाजिक कार्यकर्त्या पंकजा माने

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी