शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईत दूध, साखरेसह सकाळी घ्यावा लागतो पाण्याचा जार ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:48 IST

सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे मौन : जार व टँकर खरेदीचा दरमहिन्याला सहन करावा लागतो भार

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.स्थानिक जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व पाणीपुरवठा विभागाच्या टीमने गांधेली तलाव तसेच परदडी धरणावरून पाणी लिफ्टिंग करून आणण्यासाठी पाहणीदेखील केली होती; परंतु त्या योजनेला पुढे अचानक विराम आला. नगर परिषदेच्या दरम्यान मनपाच्या जलवाहिनीवरून नक्षत्रवाडी पॉइंटवरून मोफत टँकरने देवळाई-साताºयातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. सातारा देवळाईत सार्वजनिक विहिरीवर दर दोन दिवसाआड २४ हजार लिटरचे मोफत पाणी टाकण्यात येत आहे, इतर नागरिकांना १८ ड्रमच्या हिशेबाने पाच हजार लिटरचे टँकर खरेदी करावे लागत आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. गल्लीबोळात छोटे टँकर पाठविण्याच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून रांगेत थांबून पाण्याची कॅन, हंडे वाहून आणावेच लागतात.२४ हजार ७०० मालमत्ताधारकांना कर वसुलीसाठी मनपाने नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असून, अर्ध्याच्यावर नोटिसा पोहोचल्या आहेत. नागरिक कर भरण्यास स्वत:हून तयार आहेत; परंतु सेवासुविधांचे काय असाच सवाल नागरिकांसमोर कायम आहे.कागदी घोडे सुरूचसातारा, देवळाई मुख्य बायपासवरून एमआयडीसीची जलवाहिनी गेली असून, लगतच्या काही कॉलन्यात पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला यश आले होते. मनपा म्हणते नाहरकत प्रमाणपत्र एमआयडीसीला सादर केले, तर एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात अद्याप त्यास मंजुरी आली नाही. नागरिकांनी आंदोलनातून शंभरीच गाठली; परंतु पाणी देण्याऐवजी तोंडाला सतत पाने पुसली जात आहेत. - प्रा. प्रशांत अवचरमलपाण्यासाठी रस्त्यावर उतरणारमनपाकडून सातारा, देवळाई दोन्ही वसाहतीला मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. चाकोरीत चालणाºया शासकीय, निमशासकीय,अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरत नाही, याचा गैरफायदा मनपा घेत आहे. परिणामी कुटुंबाचे आर्थिक बजेट बिघडत आहे.-सामाजिक कार्यकर्त्या पंकजा माने

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी