शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

वारकऱ्यांच्या सेवेचा साईप्रसादचा संकल्प

By admin | Updated: April 18, 2016 00:40 IST

नांदेड : साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़

नांदेड : पदाधिकारी नसलेली, प्रसिद्धीपासून दूर आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़ सर्वेक्षणानुसार वारीमध्ये दूषित पाण्यामुळे दरवर्षी हजारो वारकरी आजारी पडतात़ त्यामुळे वारकऱ्यांना मिनरल वॉटरचे पाणी देण्यासाठी साईप्रसादने तयारी सुरु केली असून त्याचा अंदाजित खर्च जवळपास ५० लाख रुपये आहे़साईप्रसादच्या वतीने गतवर्षी आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकरी कुटुंबातील ५१ मुलींचे लग्न लावण्यात आले होते़ यंदाही फेब्रुवारीमध्ये अशाच ६३ जोडप्यांचे शुभमंगलही साईप्रसादच्या मदतीने पार पडले़ या संस्थेत वर्ग-१, २ चे निवृत्त अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी यासह शेकडो सामान्य नागरिकांचा समावेश आहे़ यापूर्वी २०१५ मध्ये पालखी सोहळ्यात श्री बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडी सोहळ्यातील जवळपास अडीच हजार वारकऱ्यांसाठी साईप्रसादच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे पूर्ण वारीकाळात या दिंडीतील एकही वारकरी आजारी पडला नाही़ पुढील यात्रा ही जूनमध्ये आहे़ या वारकऱ्यांना मिळेल त्या ठिकाणचे पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागते़ त्यामुळे वारीमध्ये अनेक जण आजारी पडतात़ त्यामुळे वारीतील ४ लाख भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी साईप्रसादने आतापासूनच तयारी सुरु केली आहे़ नांदेडात साईप्रसादचे एक हजार सदस्य असून त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे़ त्यासाठी पाच हजार लिटर प्रतितास पाणी फिल्टर करणारा प्लांट, २ हजार लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या, २०० स्वयंसेवक, १२ ट्रक, १ ट्रेलर, १० हजार लिटरचे पाण्याचे पाच टँकर, जनित्र, दहा तंबू, पाण्याच्या २० मोटारी, स्टीलचे २ हजार ग्लास आदी अनेक साहित्याची गरज आहे़ त्या सर्वांवर मिळून जवळपास ५० लाखांचा खर्च होणार आहे़ पंढरपूरमध्ये दर्शनाच्या रांगेत उभी असलेली जवळपास ८ ते १० वारकरी मंडळी ४० तास रांगेत असतात़ त्यांच्याकरिताही शेवटच्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे़ वारीनंतर पुढील अकरा महिने हा वॉटर प्लांट शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणार आहे़ जेणेकरुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय होईल़ नांदेडात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या साईप्रसादने वारकऱ्यांच्या सेवेसाठी उचललेल्या या पावलाला नांदेडकरांनीही हातभार लावावा, असे आवाहन साईप्रसादच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)