शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

वारकऱ्यांच्या सेवेचा साईप्रसादचा संकल्प

By admin | Updated: April 18, 2016 00:40 IST

नांदेड : साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़

नांदेड : पदाधिकारी नसलेली, प्रसिद्धीपासून दूर आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या साईप्रसाद संस्थेने आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारीतील तब्बल चार लाख भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे़ सर्वेक्षणानुसार वारीमध्ये दूषित पाण्यामुळे दरवर्षी हजारो वारकरी आजारी पडतात़ त्यामुळे वारकऱ्यांना मिनरल वॉटरचे पाणी देण्यासाठी साईप्रसादने तयारी सुरु केली असून त्याचा अंदाजित खर्च जवळपास ५० लाख रुपये आहे़साईप्रसादच्या वतीने गतवर्षी आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकरी कुटुंबातील ५१ मुलींचे लग्न लावण्यात आले होते़ यंदाही फेब्रुवारीमध्ये अशाच ६३ जोडप्यांचे शुभमंगलही साईप्रसादच्या मदतीने पार पडले़ या संस्थेत वर्ग-१, २ चे निवृत्त अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी यासह शेकडो सामान्य नागरिकांचा समावेश आहे़ यापूर्वी २०१५ मध्ये पालखी सोहळ्यात श्री बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडी सोहळ्यातील जवळपास अडीच हजार वारकऱ्यांसाठी साईप्रसादच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे पूर्ण वारीकाळात या दिंडीतील एकही वारकरी आजारी पडला नाही़ पुढील यात्रा ही जूनमध्ये आहे़ या वारकऱ्यांना मिळेल त्या ठिकाणचे पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागते़ त्यामुळे वारीमध्ये अनेक जण आजारी पडतात़ त्यामुळे वारीतील ४ लाख भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी साईप्रसादने आतापासूनच तयारी सुरु केली आहे़ नांदेडात साईप्रसादचे एक हजार सदस्य असून त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे़ त्यासाठी पाच हजार लिटर प्रतितास पाणी फिल्टर करणारा प्लांट, २ हजार लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या, २०० स्वयंसेवक, १२ ट्रक, १ ट्रेलर, १० हजार लिटरचे पाण्याचे पाच टँकर, जनित्र, दहा तंबू, पाण्याच्या २० मोटारी, स्टीलचे २ हजार ग्लास आदी अनेक साहित्याची गरज आहे़ त्या सर्वांवर मिळून जवळपास ५० लाखांचा खर्च होणार आहे़ पंढरपूरमध्ये दर्शनाच्या रांगेत उभी असलेली जवळपास ८ ते १० वारकरी मंडळी ४० तास रांगेत असतात़ त्यांच्याकरिताही शेवटच्या दोन दिवसांत शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे़ वारीनंतर पुढील अकरा महिने हा वॉटर प्लांट शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणार आहे़ जेणेकरुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय होईल़ नांदेडात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या साईप्रसादने वारकऱ्यांच्या सेवेसाठी उचललेल्या या पावलाला नांदेडकरांनीही हातभार लावावा, असे आवाहन साईप्रसादच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)