शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:37 IST

शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत

ठळक मुद्देशहरात पाण्यासाठी नागरिक त्रस्त : सहा महिन्यांपासून मनपाला पाण्याचे बिलही दिले नाही

मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत. त्यानंतरही प्रशासनाला पाझर फुटायला तयार नाही. महापालिकेचे शुद्ध प्रक्रिया केलेले १ लाख लिटर पाणी दररोज एस. टी. महामंडळाला देण्यात येत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ अक्षरश: बसेस धुण्यासाठी करीत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून पाण्याचे बिलही थकीत आहे.जायकवाडी धरणाने यंदा तळ गाठला आहे. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी आपत्कालीन पंपांद्वारे मनपाच्या उद्भव विहिरीपर्यंत मोठ्या कसरतीने आणण्यात येत आहे. जायकवाडीहून २० टक्के पाणी अगोदरच मनपाला कमी मिळत आहे. शहरात दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची मागणी २२० एमएलडी आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. २०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये मनपाच्या जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे त्यांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. हा दावाही फोल ठरल्याचे निदर्शनास येत आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांमध्ये आजही आठव्या आणि दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी दररोज एन-५, एन-७ येथील जलकुंभावर आंदोलने होत आहेत.शहरात पाणी कमी पडत असल्याने मनपाने एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांना समाधानकारक पाणी मिळावे म्हणून विभागीय आयुक्त सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे मनपा प्रशासन कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून एस. टी. महामंडळाला आठ ते दहा टँकरद्वारे दररोज १ लाख लिटर पाणी देत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ बसेस धुण्यासाठी करीत असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. मागील सहा महिन्यांपासून महामंडळाने पाण्यापोटी मनपाला एक रुपयाही दिला नाही.वाढीव पाण्याची मागणीघाटी रुग्णालयाने ६३ कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे केले. या रुग्णालयाला लागणारे पाणी मनपा देण्यास तयार नाही. फक्त पाण्याअभावी रुग्णालयाचे लोकार्पण थांबले आहे. त्यापाठोपाठ विमानतळ प्राधिकरण, पोलीस आयुक्तालयानेही वाढीव पाण्याची मागणी केली आहे. मनपाकडेच पाणी नाही, तर देणार कोठून, असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येत आहे.शहराचा पाणीपुरवठा१२० एमएलडी पाण्याची शहरात आवक२२० एमएलडी पाण्याची शहराला गरज७-८ दिवसांआड सिडकोत पाणीपुरवठा०५ दिवसांआड शहागंज भागात पाणी०१ मार्चपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर६० जलकुंभांद्वारे शहरात पाणीपुरवठ्याचे वितरण०४ वाजता पहाटेपासून रात्री १२ पर्यंत पाण्याचे वितरण१०५ टँकरद्वारे २०० वसाहतींना पाणीपुरवठ्याचे वितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीWaterपाणी