शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:37 IST

शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत

ठळक मुद्देशहरात पाण्यासाठी नागरिक त्रस्त : सहा महिन्यांपासून मनपाला पाण्याचे बिलही दिले नाही

मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत. त्यानंतरही प्रशासनाला पाझर फुटायला तयार नाही. महापालिकेचे शुद्ध प्रक्रिया केलेले १ लाख लिटर पाणी दररोज एस. टी. महामंडळाला देण्यात येत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ अक्षरश: बसेस धुण्यासाठी करीत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून पाण्याचे बिलही थकीत आहे.जायकवाडी धरणाने यंदा तळ गाठला आहे. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी आपत्कालीन पंपांद्वारे मनपाच्या उद्भव विहिरीपर्यंत मोठ्या कसरतीने आणण्यात येत आहे. जायकवाडीहून २० टक्के पाणी अगोदरच मनपाला कमी मिळत आहे. शहरात दररोज १२० एमएलडी पाणी येत आहे. शहराची मागणी २२० एमएलडी आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. २०० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये मनपाच्या जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे त्यांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. हा दावाही फोल ठरल्याचे निदर्शनास येत आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील विविध वॉर्डांमध्ये आजही आठव्या आणि दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी दररोज एन-५, एन-७ येथील जलकुंभावर आंदोलने होत आहेत.शहरात पाणी कमी पडत असल्याने मनपाने एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांना समाधानकारक पाणी मिळावे म्हणून विभागीय आयुक्त सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे मनपा प्रशासन कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून एस. टी. महामंडळाला आठ ते दहा टँकरद्वारे दररोज १ लाख लिटर पाणी देत आहे. या पाण्याचा वापर महामंडळ बसेस धुण्यासाठी करीत असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. मागील सहा महिन्यांपासून महामंडळाने पाण्यापोटी मनपाला एक रुपयाही दिला नाही.वाढीव पाण्याची मागणीघाटी रुग्णालयाने ६३ कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे केले. या रुग्णालयाला लागणारे पाणी मनपा देण्यास तयार नाही. फक्त पाण्याअभावी रुग्णालयाचे लोकार्पण थांबले आहे. त्यापाठोपाठ विमानतळ प्राधिकरण, पोलीस आयुक्तालयानेही वाढीव पाण्याची मागणी केली आहे. मनपाकडेच पाणी नाही, तर देणार कोठून, असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येत आहे.शहराचा पाणीपुरवठा१२० एमएलडी पाण्याची शहरात आवक२२० एमएलडी पाण्याची शहराला गरज७-८ दिवसांआड सिडकोत पाणीपुरवठा०५ दिवसांआड शहागंज भागात पाणी०१ मार्चपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर६० जलकुंभांद्वारे शहरात पाणीपुरवठ्याचे वितरण०४ वाजता पहाटेपासून रात्री १२ पर्यंत पाण्याचे वितरण१०५ टँकरद्वारे २०० वसाहतींना पाणीपुरवठ्याचे वितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीWaterपाणी