शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी

By admin | Published: August 12, 2014 12:51 AM

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साथीचे आजार नसल्याचा दावाही जि.प. आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आला.‘लोकमत’ ने ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठ्यासंबंधीचे सर्वेक्षण शनिवारी केले होते. या सर्वेक्षणाचे वृत्त रविवारच्या अंकातून प्रसिध्द झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर ग्रामपंचायतींना ही सूचना करण्यात आली.ग्रामीण भागात पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जि.प.चे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. अनेक ठिकाणी जलवाहिनी देखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनीला सतत गळती लागते. जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचे प्रकारही काही ठिकाणी आढळून आले. काही ठिकाणी वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कुपनलिकांमधील पाणी ग्रामस्थांना घ्यावे लागते. अशा कुपनलिकांभोवती घाणीचे साम्राज्य, गटारेही असतात. त्यामुळे हे पाणीही दूषित असते. जिल्ह्यात गोदाकाठावर सुमारे ४० गावांमध्ये तर बारा महिने दूषित पाणी असते. मात्र याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.पी. भटकर यांना विचारणा केली असता ग्रामीण भागात २० टक्के दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण करावे, त्यासाठी आवश्यक ब्लिचिंग साठा अगोदरच उपलब्ध ठेवावा, कुठे गटार, घाणीचे साम्राज्य असल्यास तेथे साफसफाई करावी, अशी सूचना आरोग्य विभागासह संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)