शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:21 IST

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

औरंगाबाद : स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुद्रा कर्ज योजनेतील घोटाळेही उघडे पडले. त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकारकडे दाखवायला विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार घ्यावा लागत आहे. देशभरात ६०० क ोटींची कार्यालये उभारणाऱ्या भाजपाला एवढ्या वर्षांत एक मंदिरही उभारता येऊ नये, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

गुरुवारी  खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेलाही आताच राम मंदिर का आठवले, असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. शबरीमाला मंदिर  प्रवेशाच्या मुद्यापेक्षाही देशात कुपोषण, दुष्काळ, बेरोजगारी यासारखे अनेक गंभीर विषय आहेत. ज्याची इच्छा असेल तो मंदिरात जाईल, इच्छा नसेल तर नाही जाणार. एवढा हा सोपा मुद्दा आहे; पण त्याला निरर्थक व्यापक रूप दिले जात आहे. मी टू चळवळ स्तुत्य असून ज्या महिलांचा आवाज दबलेला आहे त्यांच्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरली पाहिजे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या अनेक महिलाही मी टू चळवळीचाच भाग आहेत.  विशाखा समित्या सक्षम असत्या तर अशी प्रकरणे उद्भवलीच नसती असेही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेश, बिहारला आपण नावे ठेवतो; पण महिला सुरक्षेच्या बाबतीत आता आपल्यापेक्षा ती राज्ये बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी संवेदनशील सरकारची आवश्यकता असून, या बाबतीत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या सुरू असणारे सीबीआय प्रकरण एखाद्या कार्टून नेटवर्क चॅनलप्रमाणे वाटते आहे. सीबीआय चालवण्यास हे सरकार अपयशी ठरले, असे मत खा. सुळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना