शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:21 IST

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

औरंगाबाद : स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुद्रा कर्ज योजनेतील घोटाळेही उघडे पडले. त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकारकडे दाखवायला विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार घ्यावा लागत आहे. देशभरात ६०० क ोटींची कार्यालये उभारणाऱ्या भाजपाला एवढ्या वर्षांत एक मंदिरही उभारता येऊ नये, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

गुरुवारी  खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेलाही आताच राम मंदिर का आठवले, असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. शबरीमाला मंदिर  प्रवेशाच्या मुद्यापेक्षाही देशात कुपोषण, दुष्काळ, बेरोजगारी यासारखे अनेक गंभीर विषय आहेत. ज्याची इच्छा असेल तो मंदिरात जाईल, इच्छा नसेल तर नाही जाणार. एवढा हा सोपा मुद्दा आहे; पण त्याला निरर्थक व्यापक रूप दिले जात आहे. मी टू चळवळ स्तुत्य असून ज्या महिलांचा आवाज दबलेला आहे त्यांच्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरली पाहिजे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या अनेक महिलाही मी टू चळवळीचाच भाग आहेत.  विशाखा समित्या सक्षम असत्या तर अशी प्रकरणे उद्भवलीच नसती असेही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेश, बिहारला आपण नावे ठेवतो; पण महिला सुरक्षेच्या बाबतीत आता आपल्यापेक्षा ती राज्ये बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी संवेदनशील सरकारची आवश्यकता असून, या बाबतीत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या सुरू असणारे सीबीआय प्रकरण एखाद्या कार्टून नेटवर्क चॅनलप्रमाणे वाटते आहे. सीबीआय चालवण्यास हे सरकार अपयशी ठरले, असे मत खा. सुळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना