शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:21 IST

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

औरंगाबाद : स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुद्रा कर्ज योजनेतील घोटाळेही उघडे पडले. त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकारकडे दाखवायला विकासात्मक कामे नसल्यामुळे मतांसाठी शेवटी राम मंदिराचाच आधार घ्यावा लागत आहे. देशभरात ६०० क ोटींची कार्यालये उभारणाऱ्या भाजपाला एवढ्या वर्षांत एक मंदिरही उभारता येऊ नये, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

गुरुवारी  खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेलाही आताच राम मंदिर का आठवले, असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. शबरीमाला मंदिर  प्रवेशाच्या मुद्यापेक्षाही देशात कुपोषण, दुष्काळ, बेरोजगारी यासारखे अनेक गंभीर विषय आहेत. ज्याची इच्छा असेल तो मंदिरात जाईल, इच्छा नसेल तर नाही जाणार. एवढा हा सोपा मुद्दा आहे; पण त्याला निरर्थक व्यापक रूप दिले जात आहे. मी टू चळवळ स्तुत्य असून ज्या महिलांचा आवाज दबलेला आहे त्यांच्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरली पाहिजे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या अनेक महिलाही मी टू चळवळीचाच भाग आहेत.  विशाखा समित्या सक्षम असत्या तर अशी प्रकरणे उद्भवलीच नसती असेही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेश, बिहारला आपण नावे ठेवतो; पण महिला सुरक्षेच्या बाबतीत आता आपल्यापेक्षा ती राज्ये बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी संवेदनशील सरकारची आवश्यकता असून, या बाबतीत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या सुरू असणारे सीबीआय प्रकरण एखाद्या कार्टून नेटवर्क चॅनलप्रमाणे वाटते आहे. सीबीआय चालवण्यास हे सरकार अपयशी ठरले, असे मत खा. सुळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना